शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:31 IST

अर्थतज्ज्ञांचे मत : आरबीआयने आधीच केला होता विरोध

नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असला तरी हा मार्ग चोखाळणे योग्य नाही, असे मत आरबीआयच्या अनेक माजी अधिकाऱ्यांनी अनेकदा व्यक्त केले होते. आताही अर्थ क्षेत्रातून हेच मत व्यक्त होत असून, या निर्णयामुळे आता नाही, तरी भविष्यात आर्थिक संकट उभे राहील, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे दिसत आहे.

आरबीआयकडून केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी मिळाल्याने सध्याच्या मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल. पण रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील अतिरिक्त निधीतील किती रक्कम द्यावी आणि द्यावी का, यावरून रिझर्र्व्ह बँक व केंद्र सरकार यांच्यात सतत मतभेद होत आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे ९ लाख ६९ हजार कोटींचा अतिरिक्त निधी आहे. त्यातील काही रक्कम केंद्र सरकारने गेल्या वर्षीही मागितली होती आणि तेव्हाच त्यावरून वाद झाला होता. आम्ही तशी मागणी केलेली नाही, असे केंद्र सरकार तेव्हाही सांगत होते. पण सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील वादाची परिणती तेव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यात झाली होती, हे सर्वांनाच माहीत आहे.

गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी डायरेक्टर विरल आचार्य यांनीही रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त निधी केंद्र सरकारने घेतल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला होता. यासंदर्भात त्यांनी अर्जेंटिनाचे उदाहरण दिले होते. अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने ६ हजार लाख डॉलर्स तेथील सरकारला दिले होते. त्यानंतर अर्जेंटिनापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले, असे आचार्य यांनी नमूद केले होते.

रिझर्व्ह बँकेच्या डॉ. रघुराम राजन, वाय वेणुगोपाल रेड्डी व डी. सुब्बा राव या तीन माजी गव्हर्नरांनीही अशा प्रकारे रिझर्व बँकेने आपला अतिरिक्त निधी केंद्र सरकारला देण्यास विरोधच केला होता.वित्तीय तूट टाळण्यासाठीदेशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट दूर करण्यासाठी सरकारी खर्चात वाढ करून बाजारातील मागणीला उभारी द्यायची म्हटले तर वित्तीय तूट वाढण्याचा धोका होता. अशा अडचणीच्या काळात रिझर्व्ह बँकेकडून अनपेक्षितपणे मिळणारी मोठी रक्कम मोदी सरकारला दिलासा देणारी ठरणार आहे. हा धोरणात्मक निर्णय कायमसाठी असल्याने यापुढे दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडे शिल्लक राहणारा जास्तीचा सर्व संचित निधी सरकारला मिळत राहील.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक