शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:31 IST

अर्थतज्ज्ञांचे मत : आरबीआयने आधीच केला होता विरोध

नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असला तरी हा मार्ग चोखाळणे योग्य नाही, असे मत आरबीआयच्या अनेक माजी अधिकाऱ्यांनी अनेकदा व्यक्त केले होते. आताही अर्थ क्षेत्रातून हेच मत व्यक्त होत असून, या निर्णयामुळे आता नाही, तरी भविष्यात आर्थिक संकट उभे राहील, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे दिसत आहे.

आरबीआयकडून केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी मिळाल्याने सध्याच्या मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल. पण रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील अतिरिक्त निधीतील किती रक्कम द्यावी आणि द्यावी का, यावरून रिझर्र्व्ह बँक व केंद्र सरकार यांच्यात सतत मतभेद होत आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे ९ लाख ६९ हजार कोटींचा अतिरिक्त निधी आहे. त्यातील काही रक्कम केंद्र सरकारने गेल्या वर्षीही मागितली होती आणि तेव्हाच त्यावरून वाद झाला होता. आम्ही तशी मागणी केलेली नाही, असे केंद्र सरकार तेव्हाही सांगत होते. पण सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील वादाची परिणती तेव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यात झाली होती, हे सर्वांनाच माहीत आहे.

गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी डायरेक्टर विरल आचार्य यांनीही रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त निधी केंद्र सरकारने घेतल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला होता. यासंदर्भात त्यांनी अर्जेंटिनाचे उदाहरण दिले होते. अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने ६ हजार लाख डॉलर्स तेथील सरकारला दिले होते. त्यानंतर अर्जेंटिनापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले, असे आचार्य यांनी नमूद केले होते.

रिझर्व्ह बँकेच्या डॉ. रघुराम राजन, वाय वेणुगोपाल रेड्डी व डी. सुब्बा राव या तीन माजी गव्हर्नरांनीही अशा प्रकारे रिझर्व बँकेने आपला अतिरिक्त निधी केंद्र सरकारला देण्यास विरोधच केला होता.वित्तीय तूट टाळण्यासाठीदेशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट दूर करण्यासाठी सरकारी खर्चात वाढ करून बाजारातील मागणीला उभारी द्यायची म्हटले तर वित्तीय तूट वाढण्याचा धोका होता. अशा अडचणीच्या काळात रिझर्व्ह बँकेकडून अनपेक्षितपणे मिळणारी मोठी रक्कम मोदी सरकारला दिलासा देणारी ठरणार आहे. हा धोरणात्मक निर्णय कायमसाठी असल्याने यापुढे दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडे शिल्लक राहणारा जास्तीचा सर्व संचित निधी सरकारला मिळत राहील.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक