शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:31 IST

अर्थतज्ज्ञांचे मत : आरबीआयने आधीच केला होता विरोध

नवी दिल्ली : आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असला तरी हा मार्ग चोखाळणे योग्य नाही, असे मत आरबीआयच्या अनेक माजी अधिकाऱ्यांनी अनेकदा व्यक्त केले होते. आताही अर्थ क्षेत्रातून हेच मत व्यक्त होत असून, या निर्णयामुळे आता नाही, तरी भविष्यात आर्थिक संकट उभे राहील, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे दिसत आहे.

आरबीआयकडून केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी मिळाल्याने सध्याच्या मंदीच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल. पण रिझर्व्ह बँकेने आपल्याकडील अतिरिक्त निधीतील किती रक्कम द्यावी आणि द्यावी का, यावरून रिझर्र्व्ह बँक व केंद्र सरकार यांच्यात सतत मतभेद होत आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे ९ लाख ६९ हजार कोटींचा अतिरिक्त निधी आहे. त्यातील काही रक्कम केंद्र सरकारने गेल्या वर्षीही मागितली होती आणि तेव्हाच त्यावरून वाद झाला होता. आम्ही तशी मागणी केलेली नाही, असे केंद्र सरकार तेव्हाही सांगत होते. पण सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील वादाची परिणती तेव्हाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यात झाली होती, हे सर्वांनाच माहीत आहे.

गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी डायरेक्टर विरल आचार्य यांनीही रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त निधी केंद्र सरकारने घेतल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, असा इशारा दिला होता. यासंदर्भात त्यांनी अर्जेंटिनाचे उदाहरण दिले होते. अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने ६ हजार लाख डॉलर्स तेथील सरकारला दिले होते. त्यानंतर अर्जेंटिनापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले, असे आचार्य यांनी नमूद केले होते.

रिझर्व्ह बँकेच्या डॉ. रघुराम राजन, वाय वेणुगोपाल रेड्डी व डी. सुब्बा राव या तीन माजी गव्हर्नरांनीही अशा प्रकारे रिझर्व बँकेने आपला अतिरिक्त निधी केंद्र सरकारला देण्यास विरोधच केला होता.वित्तीय तूट टाळण्यासाठीदेशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट दूर करण्यासाठी सरकारी खर्चात वाढ करून बाजारातील मागणीला उभारी द्यायची म्हटले तर वित्तीय तूट वाढण्याचा धोका होता. अशा अडचणीच्या काळात रिझर्व्ह बँकेकडून अनपेक्षितपणे मिळणारी मोठी रक्कम मोदी सरकारला दिलासा देणारी ठरणार आहे. हा धोरणात्मक निर्णय कायमसाठी असल्याने यापुढे दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडे शिल्लक राहणारा जास्तीचा सर्व संचित निधी सरकारला मिळत राहील.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक