शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 25, 2014 16:55 IST

एफडीआय म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' अशी नवी व्याख्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजनेचे उद्घाटन केले.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - एफडीआय म्हणजे 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट' नव्हे तर 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'.. प्रत्येक भारतीयाने एफडीआयचा असा अर्थ घेऊन जबबादारी पार पाडावी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेचे उद्घाटन केले. 
भारताला जागतिक उत्पदान केंद्र बनवणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश असून या योजनेअंतर्गत ३० देशांतील तीन हजार कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. 
अमेरिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मुकेश अंबानी, चंदा कोच्चर, अझीम प्रेमजी यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. एनडीए सरकाराच्या काळात घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे विश्वासाचे वातावरण तयार झाले असून संपूर्ण जग विशेषत: आशिया खंडाचे भारताकडे लक्ष लागले आहे. 
'काही महिन्यांपूर्वीपर्यंत उद्योगपती भारताबाहेर जात होते, सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता. ही अतिशय दु:खद बाब असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.  देशात कायद्याचे राज्य असणे महत्वाचे आहे मात्र उद्योग जगताचा सरकारवर विश्वास असणेही गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.  'मेक इन इंडिया' हे सिंहाचे पाऊल असून उद्योगपतींनी देश सोडून जायचा विचार करू नये,  आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.तसेच मेक इन इंडियामुळे जगात प्रत्येक गल्लीत वास्को द गामा तयार होईल व भारताच्या शोधात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
उद्योग जगतासाठी एफडीआय ही एक चांगली संधी आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, मात्र त्यांनी येथील लोकांवर विश्वास ठेवावा. भारताकडे केवळ बाजार म्हणून न बघता येथील ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठीही उद्योगपतींनी प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले. 
उत्पादन क्षेत्राचा विकास करणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश आहे, मात्र त्याचा फायदा गरीब जनतेलाही मिळाला पाहिजे. फक्त सवलती- सूट देऊन उद्योग वाढत नाही, त्यासाठी पोषक वातावरणही लागते आणि ते निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  देशात केलेली गुंतवणूक सुरक्षित असून आपला निर्णय योग्य आहे असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे.  आपले पैसे बुडणार नाहीत हा विश्वास गुंतवणूकदारांना देणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. 
देशात फक्त सरकार असून काम होत नाही, तर त्या सरकारचे अस्तित्व जाणवणे महत्वाचे असते. उद्योगवाढीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते, त्याने देशाच्या विकासास चालना मिळते. या क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. कालच्या 'मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर कोणीही भारतातील तरूणांच्या बुद्धीमत्तेवर, गुणवत्तेवर शंका घेणार नाही, असेही ते म्हणाले.