शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 25, 2014 16:55 IST

एफडीआय म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' अशी नवी व्याख्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजनेचे उद्घाटन केले.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - एफडीआय म्हणजे 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट' नव्हे तर 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'.. प्रत्येक भारतीयाने एफडीआयचा असा अर्थ घेऊन जबबादारी पार पाडावी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेचे उद्घाटन केले. 
भारताला जागतिक उत्पदान केंद्र बनवणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश असून या योजनेअंतर्गत ३० देशांतील तीन हजार कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. 
अमेरिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मुकेश अंबानी, चंदा कोच्चर, अझीम प्रेमजी यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. एनडीए सरकाराच्या काळात घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे विश्वासाचे वातावरण तयार झाले असून संपूर्ण जग विशेषत: आशिया खंडाचे भारताकडे लक्ष लागले आहे. 
'काही महिन्यांपूर्वीपर्यंत उद्योगपती भारताबाहेर जात होते, सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता. ही अतिशय दु:खद बाब असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.  देशात कायद्याचे राज्य असणे महत्वाचे आहे मात्र उद्योग जगताचा सरकारवर विश्वास असणेही गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.  'मेक इन इंडिया' हे सिंहाचे पाऊल असून उद्योगपतींनी देश सोडून जायचा विचार करू नये,  आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.तसेच मेक इन इंडियामुळे जगात प्रत्येक गल्लीत वास्को द गामा तयार होईल व भारताच्या शोधात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
उद्योग जगतासाठी एफडीआय ही एक चांगली संधी आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, मात्र त्यांनी येथील लोकांवर विश्वास ठेवावा. भारताकडे केवळ बाजार म्हणून न बघता येथील ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठीही उद्योगपतींनी प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले. 
उत्पादन क्षेत्राचा विकास करणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश आहे, मात्र त्याचा फायदा गरीब जनतेलाही मिळाला पाहिजे. फक्त सवलती- सूट देऊन उद्योग वाढत नाही, त्यासाठी पोषक वातावरणही लागते आणि ते निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  देशात केलेली गुंतवणूक सुरक्षित असून आपला निर्णय योग्य आहे असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे.  आपले पैसे बुडणार नाहीत हा विश्वास गुंतवणूकदारांना देणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. 
देशात फक्त सरकार असून काम होत नाही, तर त्या सरकारचे अस्तित्व जाणवणे महत्वाचे असते. उद्योगवाढीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते, त्याने देशाच्या विकासास चालना मिळते. या क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. कालच्या 'मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर कोणीही भारतातील तरूणांच्या बुद्धीमत्तेवर, गुणवत्तेवर शंका घेणार नाही, असेही ते म्हणाले.