शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 25, 2014 16:55 IST

एफडीआय म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' अशी नवी व्याख्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजनेचे उद्घाटन केले.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - एफडीआय म्हणजे 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट' नव्हे तर 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'.. प्रत्येक भारतीयाने एफडीआयचा असा अर्थ घेऊन जबबादारी पार पाडावी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेचे उद्घाटन केले. 
भारताला जागतिक उत्पदान केंद्र बनवणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश असून या योजनेअंतर्गत ३० देशांतील तीन हजार कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. 
अमेरिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मुकेश अंबानी, चंदा कोच्चर, अझीम प्रेमजी यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. एनडीए सरकाराच्या काळात घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे विश्वासाचे वातावरण तयार झाले असून संपूर्ण जग विशेषत: आशिया खंडाचे भारताकडे लक्ष लागले आहे. 
'काही महिन्यांपूर्वीपर्यंत उद्योगपती भारताबाहेर जात होते, सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता. ही अतिशय दु:खद बाब असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.  देशात कायद्याचे राज्य असणे महत्वाचे आहे मात्र उद्योग जगताचा सरकारवर विश्वास असणेही गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.  'मेक इन इंडिया' हे सिंहाचे पाऊल असून उद्योगपतींनी देश सोडून जायचा विचार करू नये,  आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.तसेच मेक इन इंडियामुळे जगात प्रत्येक गल्लीत वास्को द गामा तयार होईल व भारताच्या शोधात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
उद्योग जगतासाठी एफडीआय ही एक चांगली संधी आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, मात्र त्यांनी येथील लोकांवर विश्वास ठेवावा. भारताकडे केवळ बाजार म्हणून न बघता येथील ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठीही उद्योगपतींनी प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले. 
उत्पादन क्षेत्राचा विकास करणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश आहे, मात्र त्याचा फायदा गरीब जनतेलाही मिळाला पाहिजे. फक्त सवलती- सूट देऊन उद्योग वाढत नाही, त्यासाठी पोषक वातावरणही लागते आणि ते निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  देशात केलेली गुंतवणूक सुरक्षित असून आपला निर्णय योग्य आहे असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे.  आपले पैसे बुडणार नाहीत हा विश्वास गुंतवणूकदारांना देणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. 
देशात फक्त सरकार असून काम होत नाही, तर त्या सरकारचे अस्तित्व जाणवणे महत्वाचे असते. उद्योगवाढीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते, त्याने देशाच्या विकासास चालना मिळते. या क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. कालच्या 'मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर कोणीही भारतातील तरूणांच्या बुद्धीमत्तेवर, गुणवत्तेवर शंका घेणार नाही, असेही ते म्हणाले.