शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

अपघातग्रस्त वडिलांना सायकलवर बसवून केला १२०० किमीचा प्रवास; पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे धाडस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 23:44 IST

हरियाणातून बिहारपर्यंत मारली मजल, सायकलिंग फेडरेशनने घेतली दखल

पाटणा : लॉकडाऊनमुळे रेल्वे तसेच सार्वजनिक , खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पंधरा वर्षांची एक मुलगी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर मागे बसवून हरियाणातील सिकंदरपूरहून १२०० किमीचा व सलग आठ दिवसांचा प्रवास करत बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घेऊन आली. तिच्या अनोख्या धाडसाची कहाणी उजेडात येताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका हिनेही समाजमाध्यमांवर तिचे कौतुक केले आहे.

मूळ बिहारची रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव ज्योतीकुमारी पासवान असे आहे. वडिलांसाठी तिने दाखविलेल्या धाडसाबद्दल सर्वजण प्रभावित झालेच पण सायकल चालविण्याच्या तिच्या कौशल्यालाही अनेकांनी दाद दिली. ज्योतीकुमारी पासवानला सायकलिंगचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास स्पर्धांमध्ये ती उत्तम खेळाडू म्हणूनही नाव कमावेल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यानुसार सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकारसिंग यांनी तिला भेटण्यास बोलावले. तिने १२०० किमीचा प्रवास सायकल चालवत कसा केला, याचा तपशील जाणून घेतला. ज्योतीला सायकलिंगचे उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ओंकारसिंग यांनीदिले आहे.

आपल्या वडिलांना ज्योती ज्या सायकलवर घेऊन आली ती गुलाबी रंगाची सेकंड हँड सायकल तिने दोन हजार रुपयांना विकत घेतली होती. तिला उत्तम सायकलपटू होण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्योतीचे वडील मोहन हे ई-रिक्षाचे चालक असून एका अपघातामध्ये त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नाही, त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मोहन यांचा रोजगार बुडाला.

दोन वेळच्या जेवणाला मोदात होण्याची वेळ आल्याने हरियाणातून बिहारमधील आपल्या जन्मगावी जाण्याचा त्यांनी विचार केला. पण सर्व वाहतूक स्थगित करण्यात आल्यामुळे ते व ज्योती हरियाणातील सिकंदरपूरमध्येच अडकून पडले. तिथून बिहारला मूळ गावी जाण्यासाठी मग ज्योतीनेच शक्कल लढविली. तिने आपल्या वडिलांना सायकलवर मागे बसवून पँडल मारत १२०० किमीचा प्रवास आठ दिवसांत हिकमतीने पार पाडला. 

सर्व कुटुंब पुन्हा एकत्र झाले

मोहन यांची पत्नी बिहारमधील गावामध्ये अंगणवाडी सेविकेचे काम करते. त्यांची मोठी मुलगी व जावई हे फेब्रुवारीमध्येच गावी परतले आहेत. या प्रवासात ज्योती व तिचे वडील मोहन हे काही तास पालवाल, आग्रा, मथुरा येथे थांबले होते. थोडीशी विश्रांती घेऊन मग ते पुढच्या प्रवासाला निघत. ते दोघेही गावाला परतल्याने आता सारे कुटुंबीय पुन्हा एकत्र नांदत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार