शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

“...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 08:42 IST

INDIA Alliance: इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला, तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली असली तरी निवडणुका होईपर्यंत ती टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी आता कमी कालावधी आहे. जागावाटप लवकर झाले नाही तर इंडिया आघाडीसाठी तो धोका ठरू शकेल. जागावाटपाची प्रक्रिया किंवा निर्णय त्वरीत आणि योग्य वेळेत केले पाहिजे. इंडिया आघाडीत समावेश असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, तर काही पक्ष वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी तो सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. अद्यापही वेळ गेलेली नाही, असे सूतोवाच फारूक अब्दुल्ला यांनी केले.

जागावाटपावरून मतभेद कायम, अजूनही एकमत नाही

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाचे घोडे अडले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. जागावाटपाबाबत काँग्रेसने एक समिती स्थापन केली असून, त्यात मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांना विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाची रूपरेषा ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राज्यात जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील सीपीआय आणि सीपीआयएमलाही काही जागा सोडाव्या लागणार आहे. पण, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर