शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 08:42 IST

INDIA Alliance: इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला, तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली असली तरी निवडणुका होईपर्यंत ती टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी आता कमी कालावधी आहे. जागावाटप लवकर झाले नाही तर इंडिया आघाडीसाठी तो धोका ठरू शकेल. जागावाटपाची प्रक्रिया किंवा निर्णय त्वरीत आणि योग्य वेळेत केले पाहिजे. इंडिया आघाडीत समावेश असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, तर काही पक्ष वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी तो सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. अद्यापही वेळ गेलेली नाही, असे सूतोवाच फारूक अब्दुल्ला यांनी केले.

जागावाटपावरून मतभेद कायम, अजूनही एकमत नाही

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाचे घोडे अडले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. जागावाटपाबाबत काँग्रेसने एक समिती स्थापन केली असून, त्यात मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांना विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाची रूपरेषा ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राज्यात जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील सीपीआय आणि सीपीआयएमलाही काही जागा सोडाव्या लागणार आहे. पण, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर