शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

“...तर INDIA आघाडीचे काही खरे नाही, अद्यापही वेळ गेली नाही”; फारूक अब्दुल्ला थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 08:42 IST

INDIA Alliance: इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला, तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करू शकतील, असा दावा फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडी स्थापन केली असली तरी निवडणुका होईपर्यंत ती टिकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी आता कमी कालावधी आहे. जागावाटप लवकर झाले नाही तर इंडिया आघाडीसाठी तो धोका ठरू शकेल. जागावाटपाची प्रक्रिया किंवा निर्णय त्वरीत आणि योग्य वेळेत केले पाहिजे. इंडिया आघाडीत समावेश असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, तर काही पक्ष वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी तो सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. अद्यापही वेळ गेलेली नाही, असे सूतोवाच फारूक अब्दुल्ला यांनी केले.

जागावाटपावरून मतभेद कायम, अजूनही एकमत नाही

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाचे घोडे अडले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. जागावाटपाबाबत काँग्रेसने एक समिती स्थापन केली असून, त्यात मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश यांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांना विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाची रूपरेषा ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राज्यात जागावाटपाबाबत निर्णय झालेला नाही.

दरम्यान, इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागली आहे. याशिवाय इंडिया आघाडीतील सीपीआय आणि सीपीआयएमलाही काही जागा सोडाव्या लागणार आहे. पण, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर