शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:23 IST

Farooq Abdullah on Pahalgam Attack : 'यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे.'

Farooq Abdullah on Pahalgam Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सामान्य नागरिकांपासून ते अनेक नेत्यांपर्यंत अनेकांनी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. अशातच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीदेखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. 

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला ?

 

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'मला दुःख वाटते की, आपल्या शेजाऱ्याला अजूनही हे समजत नाही की, त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही 1947 मध्ये पाकिस्तानात गेलो नाही, मग आता का जाऊ? भारताने 1947 मध्येच द्वि-राष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही, कारण देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व एक आहेत.' 

आता चर्चा नाही, तर...'पाकिस्तानला वाटते की यामुळे आम्ही कमकुवत होऊ. यामुळे आपण कमकुवत होणार नाही, तर अधिक मजबूत होऊ. पाकिस्तान म्हणत आहे की, चर्चा व्हायला हवी. आता काय चर्चा करणार? मी नेहमीच चर्चेला प्राधान्य द्यायचो. पण, आता चर्चा नाही, न्याय हवाय. आज भारताने बालाकोट नाही, तर पाकिस्तानवर अशी कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. आता सरकारने पाकिस्तानशी अखेरची लढाई लढावी आणि त्यांना जशास तसे उत्तर द्यावे,' असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाPakistanपाकिस्तान