शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:23 IST

Farooq Abdullah on Pahalgam Attack : 'यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे.'

Farooq Abdullah on Pahalgam Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सामान्य नागरिकांपासून ते अनेक नेत्यांपर्यंत अनेकांनी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत धडा शिकवण्याची मागणी करत आहेत. अशातच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीदेखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. 

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला ?

 

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'मला दुःख वाटते की, आपल्या शेजाऱ्याला अजूनही हे समजत नाही की, त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. यामुळे काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही 1947 मध्ये पाकिस्तानात गेलो नाही, मग आता का जाऊ? भारताने 1947 मध्येच द्वि-राष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही, कारण देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्व एक आहेत.' 

आता चर्चा नाही, तर...'पाकिस्तानला वाटते की यामुळे आम्ही कमकुवत होऊ. यामुळे आपण कमकुवत होणार नाही, तर अधिक मजबूत होऊ. पाकिस्तान म्हणत आहे की, चर्चा व्हायला हवी. आता काय चर्चा करणार? मी नेहमीच चर्चेला प्राधान्य द्यायचो. पण, आता चर्चा नाही, न्याय हवाय. आज भारताने बालाकोट नाही, तर पाकिस्तानवर अशी कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. आता सरकारने पाकिस्तानशी अखेरची लढाई लढावी आणि त्यांना जशास तसे उत्तर द्यावे,' असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाPakistanपाकिस्तान