शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:53 IST

शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे.

नवी दिल्ली : शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हजारो शेतकरी दिल्ली आणि नोएडाच्या सीमेवर पोहोचले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-नोएडाच्या सर्व सीमेवरील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. 

शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे. लवकरच रस्त्यावर उतरून दलित प्रेरणा स्थळावर आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.दरम्यान, दिल्लीच्या चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, कालिंदीकुंज येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केल्यानंतरच वाहतूक मार्ग वळवण्यात आला. 

नोएडाच्या सेक्टर 15 ए ते दिल्ली आणि कालिंदीकुंज ते चिल्ला बॉर्डरमार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सकाळपासून नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सोमवार असल्याने लाखो लोक कार्यालयात आले आहेत. मात्र, त्यांना परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामाया उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. 

लोकांना वाहतूक कोंडी टाळता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनी आधीच सूचना जारी केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांनी महामार्गावरच आंदोलन सुरु केले. शेतकरी सातत्याने घोषणा देत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मीडियाशी बोलताना पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता म्हणाले, "आम्हाला आधीच काही शेतकरी संघटनांबद्दल माहिती मिळाली होती. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येण्याची परवानगी दिली नाही."

नवी दिल्लीत बीएनएसचे कलम १६३ लागूनवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. जॉइंट सीपी संजय कुमार यांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चसंदर्भात विविध ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. ते म्हणाले, "संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. महामाया उड्डाणपूल, डीएनडी किंवा कालिंदीकुंज येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरुन कोणताही जमाव परवानगीशिवाय आत जाऊ नये." 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली