शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 18:53 IST

शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे.

नवी दिल्ली : शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. हजारो शेतकरी दिल्ली आणि नोएडाच्या सीमेवर पोहोचले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिल्ली-नोएडाच्या सर्व सीमेवरील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. 

शेतकऱ्यांनी सांगितले की, आता राज्य सरकारशी चर्चा करणार असून, चर्चा निष्फळ ठरली तरच दिल्लीकडे कूच केली जाणार आहे. लवकरच रस्त्यावर उतरून दलित प्रेरणा स्थळावर आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.दरम्यान, दिल्लीच्या चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, कालिंदीकुंज येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केल्यानंतरच वाहतूक मार्ग वळवण्यात आला. 

नोएडाच्या सेक्टर 15 ए ते दिल्ली आणि कालिंदीकुंज ते चिल्ला बॉर्डरमार्गे दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सकाळपासून नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सोमवार असल्याने लाखो लोक कार्यालयात आले आहेत. मात्र, त्यांना परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महामाया उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. 

लोकांना वाहतूक कोंडी टाळता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनी आधीच सूचना जारी केल्या होत्या. दरम्यान, शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. त्यावेळी त्यांनी महामार्गावरच आंदोलन सुरु केले. शेतकरी सातत्याने घोषणा देत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मीडियाशी बोलताना पूर्व दिल्लीचे डीसीपी अपूर्व गुप्ता म्हणाले, "आम्हाला आधीच काही शेतकरी संघटनांबद्दल माहिती मिळाली होती. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने त्यांना आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येण्याची परवानगी दिली नाही."

नवी दिल्लीत बीएनएसचे कलम १६३ लागूनवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. जॉइंट सीपी संजय कुमार यांनी शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो मोर्चसंदर्भात विविध ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. ते म्हणाले, "संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली परिसरात बीएनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. महामाया उड्डाणपूल, डीएनडी किंवा कालिंदीकुंज येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरुन कोणताही जमाव परवानगीशिवाय आत जाऊ नये." 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली