शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला; संयुक्त किसान मोर्चाने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 23:27 IST

Farmers Protest Chalo Delhi March: २९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याबाबत माहिती दिली जाईल, असे किसान मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

Farmers Protest Chalo Delhi March: पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. यातच शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. किसान मोर्चाने याबाबतची माहिती दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना सरबन सिंग पंढेर यांनी खनौरी सीमेवर ही माहिती दिली. ‘चलो दिल्ली मार्च’संदर्भातील पुढील रणनीती २९ फेब्रुवारीला ठरवली जाईल. आम्ही सर्व दुःखी आहोत, आमचा तरुण शेतकरी शुभकरण सिंग याला आपला जीव गमावावा लागला.२४ फेब्रुवारीला रोजी आम्ही कँडल मार्च काढू, असे सरबन सिंग पंढेर यांनी सांगितले.

२९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करू

२६ फेब्रुवारी रोजी जागतिक व्यापार संघटनेची बैठक आहे. २५ फेब्रुवारी रोजी आम्ही शंभू सीमा आणि खनौरी सीमा या दोन्ही ठिकाणी WTO चा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होत आहे यावर चर्चासत्र आयोजित करू. डब्ल्यूटीओ शेतकऱ्यांसाठी किती वाईट आहे यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कृषी क्षेत्रातील जाणकारांना बोलावणार आहोत. २७ फेब्रुवारीला शेतकरी संघटनांची बैठक घेणार आहोत. २९ फेब्रुवारीला आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची घोषणा करू, अशी माहिती सरबन सिंग पंढेर यांनी दिली. 

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्युबद्दल खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. खनौरी सीमेवरील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २१ वर्षीय शुभकरण सिंग याने शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील होण्यासाठी घर सोडले. चकमकीत तो मारला गेला. त्याच्या कुटुंबीयाना सरकारने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शवविच्छेदन रोखून धरले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन