शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

ट्रॅक्टरद्वारे सराव, पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या निवासस्थांनांना घेराव घालू शकतात आंदोलक, गोपनीय अहवालामुळे खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:46 IST

Farmers Protest: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटू शकते. शेतकरी आंदोलकांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पोलीस दल अंबालामधील शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आले आहे. तसेच तीन स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टरद्वारे घेराव घालण्याचा सराव केला असून, हे आंदोलक गुपचूपपणे दिल्लीत घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपा नेत्यांच्या निवासस्थानांना घेराव घालण्याची शक्यता गोपनीय अहवालामधून वर्तवण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत गोपनीय रिपोर्ट समोर आला आहे त्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने अनेकदा सराव केला आहे. आतापर्यंत याची ४० वेळा रंगीत तालीम झाली आहे. आंदोलनासाठी १५ ते २० हजार शेतकरी २००० ते २५०० ट्रॅक्टरसह येऊ शकतात. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधून शेतकरी येण्याची शक्यता आहे. गोपनीय अहवालानुसार आतापर्यंत या आंदोलनासाटी शेतकरी संघटनांनी १०० हून अधिक बैठका घेतल्या आहेत. 

या आंदोलनात सहभागी होऊन अराजकवादी घटक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. कार, दुचाकी, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून शेतकरी आंदोलक येऊ शकतात. काही शेतकरी गुपचूपपणे येऊन पंतप्रधान, गृहमंत्री, कृषिमंत्री आणि भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर जमून हिंसाचार करू शकतात. सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर आणि दिल्लीमध्ये कडेकोड सुरक्षेची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

शेतकरी आंदोलकांमी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने त्यांना अडवण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. सर्व पोलीस दलाला अंबाला येथील शंभू बॉर्डरवर तैनात करण्यात आले आहे. तसेच तीन स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार