शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 17:06 IST

"ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही." (Rakesh Tikait)

ठळक मुद्दे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली.इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ.सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

नवी दिल्ली - एकीकडे शेतकरी देशव्यापी ‘रेल्वे रोको’ करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली. यावेळी, "अजूनही परिस्थिती अशी आहे, की सरकारला वाटते, दोन महिन्यात पिकांची सोंगणी होईल आणि शेतकरी गावी परततील. शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागेल. उभ्या पिकाला आग लावू. पिकांचा निर्णय शेतकरी करतील सरकार नाही," असे टिकैत यांनी म्हटले आहे. (Hisar Rakesh Tikait says 40 lakh tractors will brought to delhi)

40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ -टिकैत म्हणाले, हरियाणातून आपल्याला भरपूर समर्थन मिळत आहे. ही पंचायत केवळ हरियाणा पूरतीच मर्यादित नाही, तर आम्ही प्रत्येक राज्यात जाऊन पंचायत करू. आम्ही आतापर्यंत केवळ काठी दाखवली होती. आता शेतात वापरली जाणारी साधने घेऊन दिल्लीत येऊ. एवढेच नाही, तर इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ. सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

दोन-दोन दिवस सरकार पंचायत करत आहे, सरकारला लाज वाटायला हवी. धान्य कुलूपबंद करण्याची यांची इच्छा आहे. धान्याच्या गोदामांना टाळे ठोकण्याची यांची इच्छा आहे. मात्र, असे केले गेले तर कुत्र्यांनाही भाकरी मिळणार नाही, असेही टिकैत म्हणाले.

किसान ट्रॅक्टर घेऊन बंगालला जातील - राकेश टिकैत म्हणाले, हा शेतकरी समाज आहे. ही  समुदायांची लढाई नाही. मात्र, सरकार चुकीचे समजत आहे. पहिल्यांदाच मजबुत लोकांशी सरकारचा सामना झाला आहे. सरकारने अती केले, तर हे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बंगालकडे निघतील. तेथेही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना नोकरीवरून काढले जात आहे. नेत्यांची पेन्शन संपुष्टात यावी यासाठीही लढाई लढू. ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी सकारला दिला.

भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले -"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपला श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संप