शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 17:06 IST

"ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही." (Rakesh Tikait)

ठळक मुद्दे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली.इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ.सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

नवी दिल्ली - एकीकडे शेतकरी देशव्यापी ‘रेल्वे रोको’ करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी हिसारमधील खरक पुनिया येथे महापंचायत केली. यावेळी, "अजूनही परिस्थिती अशी आहे, की सरकारला वाटते, दोन महिन्यात पिकांची सोंगणी होईल आणि शेतकरी गावी परततील. शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागेल. उभ्या पिकाला आग लावू. पिकांचा निर्णय शेतकरी करतील सरकार नाही," असे टिकैत यांनी म्हटले आहे. (Hisar Rakesh Tikait says 40 lakh tractors will brought to delhi)

40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ -टिकैत म्हणाले, हरियाणातून आपल्याला भरपूर समर्थन मिळत आहे. ही पंचायत केवळ हरियाणा पूरतीच मर्यादित नाही, तर आम्ही प्रत्येक राज्यात जाऊन पंचायत करू. आम्ही आतापर्यंत केवळ काठी दाखवली होती. आता शेतात वापरली जाणारी साधने घेऊन दिल्लीत येऊ. एवढेच नाही, तर इशारा देण्याच्या अंदाजात टिकैत म्हणाले आम्ही 40 लाख टॅक्ट्रर घेऊन दिल्लीत येऊ. सरकारचा गैरसमज दूर करावा लागेल. आम्ही पीकही कापणार आणि आंदोलनही करणार. 

... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

दोन-दोन दिवस सरकार पंचायत करत आहे, सरकारला लाज वाटायला हवी. धान्य कुलूपबंद करण्याची यांची इच्छा आहे. धान्याच्या गोदामांना टाळे ठोकण्याची यांची इच्छा आहे. मात्र, असे केले गेले तर कुत्र्यांनाही भाकरी मिळणार नाही, असेही टिकैत म्हणाले.

किसान ट्रॅक्टर घेऊन बंगालला जातील - राकेश टिकैत म्हणाले, हा शेतकरी समाज आहे. ही  समुदायांची लढाई नाही. मात्र, सरकार चुकीचे समजत आहे. पहिल्यांदाच मजबुत लोकांशी सरकारचा सामना झाला आहे. सरकारने अती केले, तर हे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बंगालकडे निघतील. तेथेही शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना नोकरीवरून काढले जात आहे. नेत्यांची पेन्शन संपुष्टात यावी यासाठीही लढाई लढू. ट्रॅक्टरमध्ये तेल टाकून ठेवा केव्हाही दिल्लीला यावे लागू शकते. जोवर कायदे मागे घेतले जाणार नाही, तोवर घरी परतणार नाही, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी सकारला दिला.

भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले -"श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपला श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही," अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणं घेणं नाही ही शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची राजकीय टीका म्हणजे राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही. हे आंदोलन मोदी सरकारच्या द्वेषाने पछाडलेले आहे हे सिद्ध करते," असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतNarendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संप