शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: टिकैत यांच्याशी चर्चेसाठी सरकारची दुहेरी रणनीती; केंद्रीय गृहमंत्रालयाची उच्चपातळीवर बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:24 IST

टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही.

हरीश गुप्तानवी दिल्ली : आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांचे बळ घटल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकार दोन प्रकारची रणनीती वापरत आहे. सध्या टिकैत सिंघू सीमेवर आघाडी सांभाळून आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयात गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी उच्च पातळीवर बैठक झाली. आंदोलनाला जनतेची सहानुभूती असल्यामुळे टिकैत यांच्याविरोधात बळाचा वापर न करण्याचे ठरले. कथित ४२ संघटनांपैकी मोजक्या संघटना सभोवताही दिसत असून मोजके शेतकरी दिल्लीच्या सीमांवर दिसतात.

हे शेतकरी धरणे आंदोलन जेथे करीत आहेत त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याचे काम दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलीस करीत आहेत. त्यानुसार आंदोलनाच्या जागी कोणालाही जाता येणार नाही व तेथून बाहेर पडता येणार नाही. शेतकऱ्यांना पाणी, वीज व आवश्यक गोष्टी मिळताहेत.सरकारने राकेश टिकैत यांच्याशी चर्चेसाठी मागचे दार खुले केले आहे. कारण त्यांनी ‘मी सरकारशी बोलण्याच्या विरोधात नाही’, असे वारंवार सांगितले होते. टिकैत गुरुवारी रात्री दूरचित्रवाणी वाहिन्यांवर रडताना दिसले व त्याचा काहीसा परिणाम त्यांच्या अनुयायांवर झाला.संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी केलेल्या त्यांच्या अभिभाषणात तिन्ही कृषी कायद्यांच्या अमलबजावणीला स्थगिती दिली गेली आहे, अशी वस्तुस्थिती सांगितली. 

दुसरे म्हणजे सरकारला जाणवले की, टिकैत यांनी त्यांच्या आधाराचा पायाच प्रत्यक्षात गमावलेला असल्यामुळे त्यांना या परिस्थितीत सिंघू सीमेवरून बळाचा वापर करून दूर करून काहीही साध्य होणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, दिल्लीच्या सीमांकडे कोणताही मोर्चा येणार नाही याची काळजी घ्यावी. “टिकैत यांना दमवून नंतर चर्चा करण्याची ही वेळ आहे. चर्चेसाठी समिती स्थापन करण्याची आमची इच्छा आहे, ” असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. ‘मी फक्त सरकारशी बोलेन. कारण लवकर तोडगा काढण्यासाठी माझ्यावर दडपण आहे. कारण शेजारच्या खेड्यांतूनही दबाब वाढतो आहे, असे टिकैत यांनी जाहीर केले होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय