शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: शेतकऱ्यांची संख्या रोडावली; आंदोलक अर्ध्यावर, संयुक्त किसान मोर्चा मात्र ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 05:40 IST

दिल्लीच्या सीमांना छावणीचे रूप

विकास झाडेनवी दिल्ली : पोलीस आणि शेतकऱ्यांचा संघर्ष झाल्यानंतर सीमांवर आता शेतकऱ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी कृषी कायद्याच्या विरोधातील हे आंदोलन मात्र कायम राहील असे स्पष्ट केले आहे. पलवल सीमेवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी उठवले आहे. अनेक शेतकरी नेत्यांवर देशद्रोह व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याने शेतकरी घाबरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या राहुट्या हटताना दिसत आहेत. 

२६ जानेवारीला जो संघर्ष झाला त्यामुळे आधीच्या तुलनेत सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. गेले दोन महिने दोन लाखांवर शेतकरी सीमांवर कायद्याविरोधात लढा देत होते. आता ही संख्या काही हजारांच्या घरात आली आहे. याचाच फायदा घेत केंद्र सरकार हे आंदोलन उधळण्याचा कट रचत असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. ३७ शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावरही आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना अटक केल्यास अन्य शेतकरी नेतेही जेलभरो करतील.

शेतकऱ्यांची शक्ती कमी होत असल्याचे दिसून येताच केंद्र सरकारने आंदोलन उधळण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. पलवल सीमेवर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनास बसले होते. याच सीमेवर खाप पंचायतचे शेतकरी होते परंतु त्यांनी २६ जानेवारी रोजी झालेल्या संघर्षानंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतली होती. आज त्यांना उठवण्यात आले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह टिकून राहावा म्हणून सिंघू सीमेपासून सोनीपतपर्यंत शेतकरी नेत्यांनी सदभावना यात्रा काढली. नेत्यांनी यावेळी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल असून उत्तर प्रदेश पोलिसांनी ही सीमा मोकळी करण्याच्या शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये दिल्लीतील विविध भागात व लाल किल्ला परिसरात जो हिंसाचार झाला, त्याप्रकरणी विविध एफआयआरमध्ये नावे नोंदविलेल्या ३७ पैकी २० शेतकरी नेत्यांवर लूकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. २० शेतकरी नेत्यांनी तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करायचे आहे. 

काँग्रेसचा आरोप, केंद्राच्या मदतीनेच हिंसाचारआंदोलनात हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCourtन्यायालय