शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

Farmers Protest: शेतकऱ्यांची संख्या रोडावली; आंदोलक अर्ध्यावर, संयुक्त किसान मोर्चा मात्र ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 05:40 IST

दिल्लीच्या सीमांना छावणीचे रूप

विकास झाडेनवी दिल्ली : पोलीस आणि शेतकऱ्यांचा संघर्ष झाल्यानंतर सीमांवर आता शेतकऱ्यांची संख्या अर्ध्यावर आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी कृषी कायद्याच्या विरोधातील हे आंदोलन मात्र कायम राहील असे स्पष्ट केले आहे. पलवल सीमेवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी उठवले आहे. अनेक शेतकरी नेत्यांवर देशद्रोह व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याने शेतकरी घाबरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या राहुट्या हटताना दिसत आहेत. 

२६ जानेवारीला जो संघर्ष झाला त्यामुळे आधीच्या तुलनेत सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. गेले दोन महिने दोन लाखांवर शेतकरी सीमांवर कायद्याविरोधात लढा देत होते. आता ही संख्या काही हजारांच्या घरात आली आहे. याचाच फायदा घेत केंद्र सरकार हे आंदोलन उधळण्याचा कट रचत असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. ३७ शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावरही आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांना अटक केल्यास अन्य शेतकरी नेतेही जेलभरो करतील.

शेतकऱ्यांची शक्ती कमी होत असल्याचे दिसून येताच केंद्र सरकारने आंदोलन उधळण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. पलवल सीमेवर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनास बसले होते. याच सीमेवर खाप पंचायतचे शेतकरी होते परंतु त्यांनी २६ जानेवारी रोजी झालेल्या संघर्षानंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतली होती. आज त्यांना उठवण्यात आले आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा उत्साह टिकून राहावा म्हणून सिंघू सीमेपासून सोनीपतपर्यंत शेतकरी नेत्यांनी सदभावना यात्रा काढली. नेत्यांनी यावेळी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल असून उत्तर प्रदेश पोलिसांनी ही सीमा मोकळी करण्याच्या शेतकऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये दिल्लीतील विविध भागात व लाल किल्ला परिसरात जो हिंसाचार झाला, त्याप्रकरणी विविध एफआयआरमध्ये नावे नोंदविलेल्या ३७ पैकी २० शेतकरी नेत्यांवर लूकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. २० शेतकरी नेत्यांनी तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करायचे आहे. 

काँग्रेसचा आरोप, केंद्राच्या मदतीनेच हिंसाचारआंदोलनात हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCourtन्यायालय