शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Farmers Protest: शेतकरी आक्रमक, उखडले अडथळे; पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 05:41 IST

आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, शंभू सीमेवर धुमश्चक्री; अनेक शेतकरी जखमी

चंडीगड/नवी दिल्ली - Farmers Agitation in Delhi ( Marathi News ) किमान हमी भावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत मंगळवारी राजधानी दिल्लीकडे कूच केली. अपेक्षेनुसार त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला. हरयाणात प्रवेश करण्यापूर्वीच दोन सीमांवर आंदोलकांना रोखले. बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा, तसेच रबरी गोळ्यांचा मारा केला. दिवसभर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी सूर्य मावळल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले; परंतु बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर संघांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेकडो ट्रॅक्टरसह सहा महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू घेऊन महिलांसह शेतकऱ्यांचा एक मोठा गट हरयाणाच्या सीमेपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या फतेहगढ साहिब येथून सकाळी दहा वाजता निघाला. त्यांना रोखण्यासाठी लावलेले अडथळे शेतकऱ्यांनी उखडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. रबरी गोळ्यांच्या माऱ्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाले.

राहुल गांधी म्हणाले...‘शेतकरी बंधूंनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे! स्वामीनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवर एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची समृद्धी सुनिश्चित करील. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.  केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करून तुरुंगात डांबत आहे.’ 

काँग्रेसने दिली ‘एमएसपी’ची हमीकाँग्रेसने ‘एमएसपी’ची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन देले आणि आपले हे आश्वासन क्रांतिकारक असून जनतेच्या पाठिंब्याने ते लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे आश्वासन दिले. 

एमएसपी कायदा घाईत आणता येणार नाहीपिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्याशिवाय घाईघाईत आणता येणार नाही. आंदोलक संघटनांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढे यावे. चर्चेच्या दोन फेऱ्यांमध्ये आम्ही त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या; पण काही मुद्यांवर सहमती झाली नाही. - अर्जुन मुंडा, केंद्रीय कृषिमंत्री

बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे बुलडोझर शेतकऱ्यांच्या ताफ्यात बॅरिकेड्स तोडण्यासाठी खोदकाम करणारे बुलडोझरही होते. त्याद्वारे सिमेंटच्या अडथळेही तोडण्यात आले. काही आंदोलकांनी धातूचे बॅरिकेड तोडून घग्गर नदीच्या पुलावरून फेकण्याचा प्रयत्न केला. काँक्रीटचे अडथळे हलवण्यासाठी आंदोलकांनी ट्रॅक्टरचाही वापर केला. तारांचे कुंपणही उखडून फेकण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार