शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Farmers Protest: शेतकरी आक्रमक, उखडले अडथळे; पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 05:41 IST

आंदोलकांना दिल्लीत येऊ न देण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, शंभू सीमेवर धुमश्चक्री; अनेक शेतकरी जखमी

चंडीगड/नवी दिल्ली - Farmers Agitation in Delhi ( Marathi News ) किमान हमी भावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा देत मंगळवारी राजधानी दिल्लीकडे कूच केली. अपेक्षेनुसार त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेचा सामना करावा लागला. हरयाणात प्रवेश करण्यापूर्वीच दोन सीमांवर आंदोलकांना रोखले. बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा, तसेच रबरी गोळ्यांचा मारा केला. दिवसभर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. संध्याकाळी सूर्य मावळल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले; परंतु बुधवारी सकाळी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर संघांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेकडो ट्रॅक्टरसह सहा महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू घेऊन महिलांसह शेतकऱ्यांचा एक मोठा गट हरयाणाच्या सीमेपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या फतेहगढ साहिब येथून सकाळी दहा वाजता निघाला. त्यांना रोखण्यासाठी लावलेले अडथळे शेतकऱ्यांनी उखडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. रबरी गोळ्यांच्या माऱ्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाले.

राहुल गांधी म्हणाले...‘शेतकरी बंधूंनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे! स्वामीनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवर एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची समृद्धी सुनिश्चित करील. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.  केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करून तुरुंगात डांबत आहे.’ 

काँग्रेसने दिली ‘एमएसपी’ची हमीकाँग्रेसने ‘एमएसपी’ची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन देले आणि आपले हे आश्वासन क्रांतिकारक असून जनतेच्या पाठिंब्याने ते लवकरच प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे आश्वासन दिले. 

एमएसपी कायदा घाईत आणता येणार नाहीपिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्याशिवाय घाईघाईत आणता येणार नाही. आंदोलक संघटनांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढे यावे. चर्चेच्या दोन फेऱ्यांमध्ये आम्ही त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या; पण काही मुद्यांवर सहमती झाली नाही. - अर्जुन मुंडा, केंद्रीय कृषिमंत्री

बॅरिकेड्स तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे बुलडोझर शेतकऱ्यांच्या ताफ्यात बॅरिकेड्स तोडण्यासाठी खोदकाम करणारे बुलडोझरही होते. त्याद्वारे सिमेंटच्या अडथळेही तोडण्यात आले. काही आंदोलकांनी धातूचे बॅरिकेड तोडून घग्गर नदीच्या पुलावरून फेकण्याचा प्रयत्न केला. काँक्रीटचे अडथळे हलवण्यासाठी आंदोलकांनी ट्रॅक्टरचाही वापर केला. तारांचे कुंपणही उखडून फेकण्यात आले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार