शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी संघटनांची मोठी घोषणा; पुन्हा आंदोलन करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 19:39 IST

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता शेतकरी संघटनांनी देखील मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली-

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता शेतकरी संघटनांनी देखील मोठी घोषणा केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी रोजी शेतकरी संघटना केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. ३१ जानेवारीचा दिवस सरकारविरोधात विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे. यात देशभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकार विरोधात पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जाणार आहे. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी २१ जानेवारी रोजी ३ ते ४ दिवसांसाठी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचा दौरा करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. यात पीडीत शेतकरी कुटुंबीयांची भेट राकेश टिकैत घेणार आहेत. तसंच आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचंही टिकैत यांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारनं अद्याप एमएसपीसाठी कोणतीही समिती अद्याप स्थापन केलेली नाही. तसंच कुणीही आमच्याशी संपर्क केलेला नाही. लखीमपूर खीरी हत्याकांडात सहभागी असलेल्या राज्यमंत्र्यावरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारनं जर आमच्या मागण्यांवर उत्तर दिलं नाही. तर आम्ही ३१ जानेवारी रोजी विश्वासघात दिवस साजरा करू, असं भारतीय किसान संघाचे नेते युद्धवीर सिंह यांनी सांगितलं. 

पंजाब निवडणुकीवरही चर्चाशेतकरी संघटनांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. निवडणूक लढणाऱ्या शेतकरी नेत्यांनी संयुक्त मोर्चातून बाहेर पडावं असं काहींचं म्हणणं आहे. 

तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर इतर मागण्यांवर सहमतीनंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी संयुक्त मोर्चानं आंदोलन संपुष्टात आणून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेत शेतकरी संघटनांनी सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर केल्या गेलेल्या कामाची समिक्षा केली गेली होती. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२