शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली, आज भारत बंदची हाक; ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 08:02 IST

शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे आता देशभरात आज भारत बंदची हाक दिली आहे.

एमएसपी वरील कायदेशीर हमी म्हणजेच किमान आधारभूत किंमत यासह अनेक मागण्यांसह हजारो शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, संयुक्त किसान मोर्चासह अनेक शेतकरी संघटनांनी आज शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. आपल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या भारत बंदचा ग्रामीण भागात अधिक परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. भारत बंदबाबत दिल्ली-एनसीआर ते पंजाब-हरियाणापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.

शेतकरी आंदोलकांना हरियाणा-पंजाबच्या वेगवेगळ्या सीमेवर रोखण्यात आले आहे. हरियाणा पोलीस आणि सुरक्षा दलांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनीही आपल्या सीमा मजबूत केल्या आहेत. 

संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांना एकत्र येऊन भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसभर आंदोलन सुरू राहणार आहे. आता या भारत बंदमध्ये काय बंद राहणार आणि काय खुले राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी संघटनांच्या देशव्यापी भारत बंदमुळे वाहतूक, कृषी उपक्रम, खासगी कार्यालये, गावातील दुकाने आणि ग्रामीण औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील संस्था आज बंद राहण्याची शक्यता आहे. 

देशभरातील शेतकरी भारत बंदमध्ये सामील होत आहेत, त्यामुळे दिल्ली आणि यूपीच्या गाझीपूर सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत बंदबाबत शेतकरी संघटना यूपी गेटपर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे, अशा परिस्थितीत गाझीपूर सीमेवर कडक तयारी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये अनेक ट्रक संघटना आणि कामगार संघटनाही सहभागी होत आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली