शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

कृषी विधेयकं रद्द तरीही आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम; केंद्राला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 06:49 IST

सरकारशी चर्चेसाठी ५ जणांची समिती, केंद्राला दिली दोन दिवसांची मुदत 

नवी दिल्ली : सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याशिवाय कृषी कायद्यांविरोधात गेले वर्षभर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. शनिवारी सिंघु सीमेवर पार पडलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ५ नेत्यांची समिती गठीत केली आहे. 

शेतमालाला हमीभावाचे संरक्षण, शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आदी मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे. सरकारची स्थिती स्पष्ट केल्यानंतर यावर विचारविनिमय करण्यासाठी शेतकरी ७ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक घेणार आहेत.

७०२ शेतकऱ्यांची यादी पाठवली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितले होते की, आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनात आपला जीव गमावलेल्या ७०२ शेतकऱ्यांच्या नावांची यादी शेतकऱ्यांनी संयुक्त कृषी सचिवांना पाठवून दिली आहे.

nसरकारशी चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये बलबीरसिंह राजेवाल, गुरुनाम चढुनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कक्का आणि अशोक ढवळे यांचा समावेश कऱण्यात आला आहे. बैठकीनंतर शेतकरी नेते जोगिंदर सिंह उगराहा म्हणाले की, वीज कायदा २०२०, कृषी कचरा जाळणे, शेतमालाला हमी भावासंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन