शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कृषी विधेयकं रद्द तरीही आंदोलन मागे न घेण्यावर शेतकरी ठाम; केंद्राला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 06:49 IST

सरकारशी चर्चेसाठी ५ जणांची समिती, केंद्राला दिली दोन दिवसांची मुदत 

नवी दिल्ली : सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याशिवाय कृषी कायद्यांविरोधात गेले वर्षभर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. शनिवारी सिंघु सीमेवर पार पडलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ५ नेत्यांची समिती गठीत केली आहे. 

शेतमालाला हमीभावाचे संरक्षण, शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणे, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आदी मागण्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे. सरकारची स्थिती स्पष्ट केल्यानंतर यावर विचारविनिमय करण्यासाठी शेतकरी ७ डिसेंबर रोजी पुन्हा बैठक घेणार आहेत.

७०२ शेतकऱ्यांची यादी पाठवली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितले होते की, आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनात आपला जीव गमावलेल्या ७०२ शेतकऱ्यांच्या नावांची यादी शेतकऱ्यांनी संयुक्त कृषी सचिवांना पाठवून दिली आहे.

nसरकारशी चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये बलबीरसिंह राजेवाल, गुरुनाम चढुनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कक्का आणि अशोक ढवळे यांचा समावेश कऱण्यात आला आहे. बैठकीनंतर शेतकरी नेते जोगिंदर सिंह उगराहा म्हणाले की, वीज कायदा २०२०, कृषी कचरा जाळणे, शेतमालाला हमी भावासंदर्भात सरकारकडून अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन