शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शेतकऱ्यांना आठवड्यातील चार दिवस दिवसा १२ तास वीज

By admin | Updated: September 15, 2016 01:01 IST

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही.

समीर कुणावार यांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासावर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. याबाबत ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी दिली.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. पाऊस आला तर एकदम येतो. नाही तर चांगलीच दडी मारतो. यामुळे शेतकरी अडचणीत असताना वीज वितरण कंपनीही नेमकी शेतीला ओलित करण्याच्या वेळेतच भारनियमाच्या नावावर वीज पुरवठा खंडित करते. यामुळे दोन्ही बाजुने शेतकरी पिंजला जात आहे. काही शेतकऱ्यांनी ही बिकट परिस्थिती आ. समीर कुणावार यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिली. आ. कुणावार यांनी या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन २४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. ऐन ओलिताच्या वेळीच भारनियमन होत असल्यामुळे शेतीता पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात भारनियमन करु नये, अशी विनंती केली. ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री हिंगणघाट येथे आले असता या पत्राचे पुनश्च स्मरण करुन दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ही बाब गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. ना. बावणकुळे यांनीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले, ही बाब खुद्द ना. बावळकुळे यांनी दूरध्वनीद्वारे कळविली असल्याची माहिती आ. कुणावार यांना दिली. यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)