शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

शेतकऱ्यांना आठवड्यातील चार दिवस दिवसा १२ तास वीज

By admin | Updated: September 15, 2016 01:01 IST

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही.

समीर कुणावार यांची माहिती : शेतकऱ्यांना दिलासावर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे, यासाठी आठवड्यातून चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. याबाबत ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी दिली.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसत आहे. पाऊस आला तर एकदम येतो. नाही तर चांगलीच दडी मारतो. यामुळे शेतकरी अडचणीत असताना वीज वितरण कंपनीही नेमकी शेतीला ओलित करण्याच्या वेळेतच भारनियमाच्या नावावर वीज पुरवठा खंडित करते. यामुळे दोन्ही बाजुने शेतकरी पिंजला जात आहे. काही शेतकऱ्यांनी ही बिकट परिस्थिती आ. समीर कुणावार यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिली. आ. कुणावार यांनी या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन २४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा व्यत्यय निर्माण झाला आहे. ऐन ओलिताच्या वेळीच भारनियमन होत असल्यामुळे शेतीता पाणी देता येत नाही. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात भारनियमन करु नये, अशी विनंती केली. ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री हिंगणघाट येथे आले असता या पत्राचे पुनश्च स्मरण करुन दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ही बाब गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. ना. बावणकुळे यांनीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत भारनियमन न करण्याचे आदेश दिले, ही बाब खुद्द ना. बावळकुळे यांनी दूरध्वनीद्वारे कळविली असल्याची माहिती आ. कुणावार यांना दिली. यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)