शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकरी प्यायले मूत्र, उद्या विष्ठा खाण्याचा दिला इशारा

By admin | Updated: April 22, 2017 16:45 IST

कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी महिन्याभरापासून जंतरमंतरवर निदर्शनं करणा-या तामिळनाडूतील शेतक-यांचा संयम आता टोक गाठण्याची शक्यता आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी महिन्याभरापासून जंतरमंतरवर निदर्शनं करणा-या तामिळनाडूतील शेतक-यांचा संयम आता टोक गाठण्याची शक्यता आहे. याचे उदाहरण सांगायचे झाले तर आपल्या मागण्यांसाठी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करणा-या या शेतक-यांनी आज चक्क मूत्र प्राशन केले आहे. 
 
"आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर शनिवारी मूत्र प्राशन करणार, मात्र जर याकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले नाही  तर रविवारी स्वतःची विष्ठा खाऊन सरकारचा निषेध करू", अशी धमकीवजा इशारा या शेतक-यांनी दिला आहे.
 
गेल्या 38 दिवसांपासून हे शेतकरी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करत असल्यानं चर्चेत आहे. याआधी मानवी हाडे घेऊन या शेतक-यांनी आंदोलन केले होते. आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे सांगाडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर कधी विवस्त्र होऊन, कधी रस्त्यांवर सांबार-भात खाऊन निदर्शनं केली आहेत, इतकेच नाही तर कधी साप तसेच उंदीर खाऊनही यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शनं केली आहेत. पण सरकारनं अद्यापपर्यंत त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या शेतक-यांचे आंदोलन आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. 
 
दुष्काळामुळे शेतीचं नुकसान झाले, त्यामुळे सरकारने कर्जमाफी द्यावी, आर्थिक मदत करावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. दरम्यान, सरकार आमच्याकडे यासाठी दुर्लक्ष करत आहे कारण त्यांना आम्हाला दिल्लीतून पळवून लावायचे आहे. यापेक्षा आम्हाला अटकच केले तर बरे होईल, अशी भावनादेखील या शेतक-यांनी व्यक्त केली आहे.  
 
काही दिवसांपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांपैकी सात जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात नेण्यात आले होते. मात्र मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. वारंवार निराशा होत असल्यानं अखेर शेतक-यांनी आज मूत्र प्राशन करत सरकारचा निषेध व्यक्त केला व सोबत उद्या विष्ठा खाण्याचा इशारा दिला आहे.