शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ३० कोटी वाचणार

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

शेतकर्‍यांऐवजी आता खरेदीदाराकडून वसूल करण्यात येणार आडत कमिशन

शेतकर्‍यांऐवजी आता खरेदीदाराकडून वसूल करण्यात येणार आडत कमिशन
रामेश्वर काकडे- शेतकर्‍यांच्या शेतमालावार आकारले जाणारे आडत कमिशन रद्द करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे ३० कोटी रुपये वाचणार आहेत.
शेतकर्‍यांना आकारण्यात येणारे आडत कमिशन रद्द करण्याची गत अनेक वर्षापासूनची मागणीला या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. बळीराजाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. कृषी उत्प्न्न बाजार समित्यामध्ये होणार्‍या शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात आडते-दलाल यांनी कोणत्याच प्रकराच्या शेतमाल विक्रीमुल्यावर शेतकर्‍याकडून आडत कमिशन वसूली करु नये, असे आदेश बाजार समित्यांना निर्गमित करण्यात आले आहेत.
तर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार्‍या शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात यापुढे आता शेतकर्‍याऐवजी खरेदीदाराकडून आडत कमिशन वसूल करण्यात येईल.
या आदेशाची जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहाय्यक संस्था, कृषि उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार यांनी काटेकोरपणे अमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी प्रत्येक बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री करीत असतांना विक्री केलेल्या शेतमालाच्या रक्कमेवर ३ ते ६ टक्के आडत कमिशन म्हणून आकारले जात होते. भूसार मालासाठी तीन टक्के तर केळी व फळे यासाठी ६ ते १० टक्के आडत कमिशन होते. याचा शेतकर्‍यांना नाहक भूर्दंड सोसावा लागत असे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणनच्या तरतुदीनुसार बाजार समित्यांना शासनाच्या पूर्वमान्यतेने अडतीचे दर ठरविण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. कृषि माल उत्पादकांचे सबलीकरण अद्यापही पूर्णत्वास गेलेले नसून शेती उत्पादन हे पूर्णता निसर्गावर अवलंबून असल्याने त्यावर अनिश्चितीचे सावट कायम आहे.
शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक खच्चीकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी हे एकमेव उत्पादक आहेत की त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला भाव ठरविण्याचा त्यांना अधिकार नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतीही तोट्यामध्ये जात आहे. शेतीमालाचे उत्पादन करुन कष्टाचा मोबदला मिळविणार्‍या बळीराजाकडून आडत म्हणून विक्री केलेल्या मूल्याच्या ३ ते ६ टक्के सेवाशुल्क वसूल केले जात असे. मात्र व्यापार धंदा करुन नफा मिळविणार्‍या खरेदीदाराकडून नाममात्र ५० पैसे ते १ रुपया बाजार फिस वसूल करण्यात येत होती. यापुढे शेतकर्‍यांकडून कोणतेही सेवाशुल्क-आडत कमिशन वसूल न करता ते खरेदीदाराकडून करण्यात येणार आहे. याची व्यापारी वर्गाला काही प्रमाणात झळ बसणार असली तरी बळीराजा या कटकटीतून कायमचा सूटणार आहे.
गत अनेक वर्षापासून म्हणजे बाजार समित्या अस्तिवात आल्या तंेव्हापासून शेतीमालावार वसूल करण्यात येणारे आडत कमिशन यापुढे खरेदीदाराकडून वसूल करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण १९ कृषि उत्पन्न बाजार समित्या असून यापैकी नांदेड, धर्माबाद, देगलूर, भोकर, हदगाव, नायगाव, किनवट, लोहा, मुखेड, उमरी, कंधार, बिलोली, हाणेगाव, हिमायतनगर, कुंडलवाडी, कुटुंर, माहूर व मुदखेड अशा १८ बाजार समित्यामध्ये वर्षाकाठी जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. त्यावर सरासरी तीन टक्के प्रमाणे आडत कमिशन गृहीत धरल्यास वर्षाकाठी शेतकर्‍यांकडून ३० कोटी रुपयांची वसूली केली जात होती. मात्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे या कचाट्यातून बळीराजाची मुक्तता झाली.
सदर निर्णयाचे आदेश प्राप्त होताच नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारपासून प्रशासकाने त्याची अमलबजावणी केली आहे.
विनायक कहाळेकर.
जिल्हा उपनिबंधक
फळपिक उत्पादकांना मोठा दिलासा
फळपिके ही नाशवंत असल्यामुळे त्यावर सर्वात जास्त ६ ते १३ टक्के आडत कमिशन आकारले जात होते. मात्र आता त्यातून उत्पादकांची कायमची सूटका झाली आहे.