शेतकर्यांनी अडविला महामार्ग कांद्याच्या फेरलिलावाची मागणी : अचानक भाव गडगडल्याने संताप
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
राहाता : काद्यांचे फेर लिलाव करावेत, या मागणसाठी शुक्रवारी संतप्त शेतकर्यांनी राहाता बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर अडीच तास रास्तारोको केला़ त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनाच्या लाबंच लाब रांगा लागल्या होत्या़
शेतकर्यांनी अडविला महामार्ग कांद्याच्या फेरलिलावाची मागणी : अचानक भाव गडगडल्याने संताप
राहाता : काद्यांचे फेर लिलाव करावेत, या मागणसाठी शुक्रवारी संतप्त शेतकर्यांनी राहाता बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर अडीच तास रास्तारोको केला़ त्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनाच्या लाबंच लाब रांगा लागल्या होत्या़ राहाता बाजार समितीत शुक्रवारी ४० हजार कांदा गोण्यांची आवक झाली़ यातील सुमारे ४० टक्के कांदा गोण्यांचा लिलाव होऊन क्विंटलमागे पाचशे रुपयापर्यंत भावाने लिलाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले़ अचानक कमी भावाने कांदा खरेदी करण्याच्या व्यापारीवृत्तीचा निषेध करीत शेतकर्यांनी जादा दराची मागणी केली़ मात्र, शेतकर्यांची मागणी मान्य न करीत व्यापार्यांनीही आम्हीच सांगू तो दर अशी भूमिका घेतली़ त्यामुळे कोपरगाव, येवला, राहाता येथून आलेल्या शेतकर्यांनी नगर-मनमाड महामार्गावर येऊन रास्तारोको आंदोलन केले़ काद्याचे भाव वाढऊन द्या, काद्यांचे फेर लिलाव करा, अशी मागणी शेतकर्यांनी केली़ बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडु, उपसभापती कैलास जमधडे, सचिव उद्धव देवकर यांनी शेतकर्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ मात्र, कांद्याचे दर वाढवून दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा शेतकर्यांनी घेतला़ नायब तहसिलदार राहुल कोताडे यांनी मध्यस्ती करीत फेर लिलाव करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ नायब तहसिलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थित बाजार समितीत पुन्हा लिलाव सुरु झाले़ मात्र, कांद्याचे दर वाढवून मिळत नसल्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली़ शुक्रवारचे लिलाव स्थगित करुन शनिवारी सकाळी ९ वाजता लिलाव पुकारण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला़