शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:45 IST

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

चंडीगड : किमान हमीभावाचा कायदा करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाच्या अंबाला, कुरूक्षेत्र, कैथल, जींद, हिसार, फतेहाबाद, सिरसा या ७ जिल्ह्यांत लावण्यात आलेली मोबाइल इंटरनेट व सामूहिक एसएमएस (संदेश) सेवेवरील बंदी शनिवारी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारकडून सर्वप्रथम ११ फेब्रुवारी रोजी इंटरनेट व सामूहिक एसएमएसवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १३, १५, १७, १९, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी बंदीला मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी आंदोलनाचा १२ दिवस होता. परिस्थिती अजूनही गंभीर आणि तणावपूर्ण असल्यामुळे इंटरनेट व सामूहिक एसएमएसवरील बंदी वाढविण्यात येत आहे. व्हॉईस कॉल सेवा मात्र सुरू राहील, असे अतिरिक्त मुख्य सचिव टी .व्ही. एस .एन.प्रसाद यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

चकमकीनंतर मोर्चाला ५ दिवसांचा ब्रेकखनौरी येथे पोलिस आणि आंदोलकांत चकमक झाल्यानंतर बुधवारी शेतकऱ्यांची दिल्ली कूच २ दिवसांसाठी स्थगित केली होती. आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत...खनौरी येथे ठार झालेला शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा नोंदवावा; अन्यथा तोपर्यंत शुभकरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा शेतकरी नेते  जगजीत सिंह डल्लेवाल यांनी दिला. 

जखमी शेतकऱ्यांना आमच्याकडे सोपवा; पंजाब पोलिसांची मागणीदरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी शनिवारी हरयाणाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहून जखमी शेतकऱ्यांना मोफत उपचारासाठी पंजाब सरकारच्या स्वाधीन करण्याची मागणी केली.रोहतकमध्ये उपचार घेत असलेले प्रीतपालसिंह आणि इतर शेतकऱ्यांना आपल्याकडे सोपविण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन