शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:45 IST

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

चंडीगड : किमान हमीभावाचा कायदा करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाच्या अंबाला, कुरूक्षेत्र, कैथल, जींद, हिसार, फतेहाबाद, सिरसा या ७ जिल्ह्यांत लावण्यात आलेली मोबाइल इंटरनेट व सामूहिक एसएमएस (संदेश) सेवेवरील बंदी शनिवारी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारकडून सर्वप्रथम ११ फेब्रुवारी रोजी इंटरनेट व सामूहिक एसएमएसवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १३, १५, १७, १९, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी बंदीला मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी आंदोलनाचा १२ दिवस होता. परिस्थिती अजूनही गंभीर आणि तणावपूर्ण असल्यामुळे इंटरनेट व सामूहिक एसएमएसवरील बंदी वाढविण्यात येत आहे. व्हॉईस कॉल सेवा मात्र सुरू राहील, असे अतिरिक्त मुख्य सचिव टी .व्ही. एस .एन.प्रसाद यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

चकमकीनंतर मोर्चाला ५ दिवसांचा ब्रेकखनौरी येथे पोलिस आणि आंदोलकांत चकमक झाल्यानंतर बुधवारी शेतकऱ्यांची दिल्ली कूच २ दिवसांसाठी स्थगित केली होती. आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत...खनौरी येथे ठार झालेला शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा नोंदवावा; अन्यथा तोपर्यंत शुभकरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा शेतकरी नेते  जगजीत सिंह डल्लेवाल यांनी दिला. 

जखमी शेतकऱ्यांना आमच्याकडे सोपवा; पंजाब पोलिसांची मागणीदरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी शनिवारी हरयाणाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहून जखमी शेतकऱ्यांना मोफत उपचारासाठी पंजाब सरकारच्या स्वाधीन करण्याची मागणी केली.रोहतकमध्ये उपचार घेत असलेले प्रीतपालसिंह आणि इतर शेतकऱ्यांना आपल्याकडे सोपविण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन