शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्चची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:12 IST

Farmer Protest: सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी शेतकऱ्यांकडून देशभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना संघू आणि शंभूसह दिल्लीला जोडणाऱ्या सीमेवर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या दिवशी ट्रॅक्टर मोर्चासह नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रती जाळण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.  

शेतकरी संघटनांनी १ ऑगस्ट रोजी मोदी सरकारची तिरडी जाळण्याचाही निर्णय घेतला आहे. यादरम्यान, एमएसपीवर कायदेशीर गॅरंटीसह जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची रणनीती आखली आहे. यादरम्यान क्रिमिनल लॉची कॉपीसुद्धा जाळली जाईल. तसेच देशभरातील शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शंभू बॉर्डरवर महिनाभराचा शिधा घेऊन शेतकरी पोहोचत आहेत.

दरम्यान, शंभू बॉर्डरवर शेतकरी बऱ्याच दिवसांपासून ठाण मांडून बसलेले आहेत.  ३१ ऑगस्ट रोजी या आंदोलना २०० दिवस पूर्ण होतील. शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांनी बॉर्डरवर पोहोचावे असे आवाहन केले आहे. तर हरियाणामध्ये १५ सप्टेंबर रोजी जिंद येथे आणि २२ सप्टेंबर रोजी हरियाणामधील पीपली येथे शेतकऱ्यांच्या सभेचं आयोजन केलं आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनी माजी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्रा आशिष टेनी यांना जामीन देण्याच्या निर्णयालाही विरोध केला आहे. 

हमिभावासह १२ मागण्या घेऊन पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. मात्र त्यांना शंभू बॉर्डर येथे रोखण्यात आले. दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बंद करण्यात आलेली शंभू बॉर्डर एका आठवड्यात खुली करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्याची मुदत १७ जुलै रोजी संपुष्टात आली आङे. मात्र या प्रकरणी हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार