शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी करणार दिल्लीकडे कूच, १५ ऑगस्टला ट्रॅक्टर मार्चची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:12 IST

Farmer Protest: सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारच्या तीन नव्या फौजदारी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या कायद्यांविरोधात शेतकरी आथा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्याकडून याची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनादिवशी शेतकऱ्यांकडून देशभरामध्ये ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना संघू आणि शंभूसह दिल्लीला जोडणाऱ्या सीमेवर पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच या दिवशी ट्रॅक्टर मोर्चासह नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रती जाळण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.  

शेतकरी संघटनांनी १ ऑगस्ट रोजी मोदी सरकारची तिरडी जाळण्याचाही निर्णय घेतला आहे. यादरम्यान, एमएसपीवर कायदेशीर गॅरंटीसह जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची रणनीती आखली आहे. यादरम्यान क्रिमिनल लॉची कॉपीसुद्धा जाळली जाईल. तसेच देशभरातील शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शंभू बॉर्डरवर महिनाभराचा शिधा घेऊन शेतकरी पोहोचत आहेत.

दरम्यान, शंभू बॉर्डरवर शेतकरी बऱ्याच दिवसांपासून ठाण मांडून बसलेले आहेत.  ३१ ऑगस्ट रोजी या आंदोलना २०० दिवस पूर्ण होतील. शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांनी बॉर्डरवर पोहोचावे असे आवाहन केले आहे. तर हरियाणामध्ये १५ सप्टेंबर रोजी जिंद येथे आणि २२ सप्टेंबर रोजी हरियाणामधील पीपली येथे शेतकऱ्यांच्या सभेचं आयोजन केलं आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनी माजी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्रा आशिष टेनी यांना जामीन देण्याच्या निर्णयालाही विरोध केला आहे. 

हमिभावासह १२ मागण्या घेऊन पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. मात्र त्यांना शंभू बॉर्डर येथे रोखण्यात आले. दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बंद करण्यात आलेली शंभू बॉर्डर एका आठवड्यात खुली करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्याची मुदत १७ जुलै रोजी संपुष्टात आली आङे. मात्र या प्रकरणी हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार