शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: कडाक्याच्या थंडीतही आंदोलनात जोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:40 IST

लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.

नवी दिल्ली :  कृषी कायदे हे केवळ मोदींच्या ‘परिवारा’भोवती फिरणारे आहेत. शेतीचे व्यापारीकरण होताना अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे. कायदे मागे घ्यावेत या भूमिकेवर संयुक्त किसान मोर्चा ठाम आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.अ. भा. किसान संघर्ष समन्वय कोअर टीमच्या सदस्य मेधा पाटकर या हजारो शेतकºयांसोबत आंदोलनात सहभागी झाल्यात. दोन दिवस त्यांनी पलवल सीमेवर घालवले. देशभरातील शेतकरी संघटना या ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या फलकाखाली न्याय्य लढाई लढत असून यात सहभागी झालेल्या ८०० संघटनांचा सूर एकच आहे. तो म्हणजे हे कायदे मागे घेणे.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणावर ‘लोकमत’शी बोलताना पाटकर म्हणाल्या, केवळ दिल्लीच्या सीमाच शेतकºयांनी अडविल्या आहेत असे नाही तर संपूर्ण देशात शेतकºयांचा एल्गार पहायला मिळतो आहे. सिंघू सीमेवर लाखांवर शेतकरी आहेत. जयपूर मार्गावरही तशीच गर्दी जमली आहे. विविध राज्यातून येणाºया सीमेवर हजारोंच्या संख्येत शेतकरी आलेले आहेत. या गर्दीमुळेच सरकारने चर्चेचे नाटक केले, यावर पाच बैठका घेतल्या. निष्पन्न काहीच झाले नाही. शेतकऱ्यांचा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्नचिल्ला सीमेवर संधी मिळताच शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पुढे त्यांना अडवले व रस्ता बंद केला आहे. टिकरी सीमेवरही आता गर्दी होत आहे. यूपी गेटवर शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनाही आज शेतकऱ्यांनी अडवले.अदानी, अंबानींच्या ५३ कंपन्या?दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनात सहभागी झालेले पंजाबच्या खडूर साहिब येथील कॉँग्रेसचे खासदार जे. एस. गिल यांनी गेल्या काही महिन्यात अदानी आणि अंबानींच्या कृषी क्षेत्राशी संबंधित ५३ कंपन्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती दिली.