शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

Farmer Protest: कडाक्याच्या थंडीतही आंदोलनात जोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:40 IST

लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.

नवी दिल्ली :  कृषी कायदे हे केवळ मोदींच्या ‘परिवारा’भोवती फिरणारे आहेत. शेतीचे व्यापारीकरण होताना अन्न सुरक्षा धोक्यात येणार आहे. कायदे मागे घ्यावेत या भूमिकेवर संयुक्त किसान मोर्चा ठाम आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असतानाही केंद्र सरकारमध्ये ‘संवाद’शीलता नसल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांनी केला.अ. भा. किसान संघर्ष समन्वय कोअर टीमच्या सदस्य मेधा पाटकर या हजारो शेतकºयांसोबत आंदोलनात सहभागी झाल्यात. दोन दिवस त्यांनी पलवल सीमेवर घालवले. देशभरातील शेतकरी संघटना या ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या फलकाखाली न्याय्य लढाई लढत असून यात सहभागी झालेल्या ८०० संघटनांचा सूर एकच आहे. तो म्हणजे हे कायदे मागे घेणे.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणावर ‘लोकमत’शी बोलताना पाटकर म्हणाल्या, केवळ दिल्लीच्या सीमाच शेतकºयांनी अडविल्या आहेत असे नाही तर संपूर्ण देशात शेतकºयांचा एल्गार पहायला मिळतो आहे. सिंघू सीमेवर लाखांवर शेतकरी आहेत. जयपूर मार्गावरही तशीच गर्दी जमली आहे. विविध राज्यातून येणाºया सीमेवर हजारोंच्या संख्येत शेतकरी आलेले आहेत. या गर्दीमुळेच सरकारने चर्चेचे नाटक केले, यावर पाच बैठका घेतल्या. निष्पन्न काहीच झाले नाही. शेतकऱ्यांचा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्नचिल्ला सीमेवर संधी मिळताच शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पुढे त्यांना अडवले व रस्ता बंद केला आहे. टिकरी सीमेवरही आता गर्दी होत आहे. यूपी गेटवर शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनाही आज शेतकऱ्यांनी अडवले.अदानी, अंबानींच्या ५३ कंपन्या?दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनात सहभागी झालेले पंजाबच्या खडूर साहिब येथील कॉँग्रेसचे खासदार जे. एस. गिल यांनी गेल्या काही महिन्यात अदानी आणि अंबानींच्या कृषी क्षेत्राशी संबंधित ५३ कंपन्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती दिली.