शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

पाकिस्तानात जितके दहशतवादी नाहीत, तेवढे आपल्याकडे देशद्रोही आहेत - तरुण सागर

By admin | Updated: June 30, 2017 14:16 IST

पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
सीकर (राजस्थान), दि. 30 - आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाकिस्तानमध्ये जितके दहशतवादी नाहीत, त्याहून जास्त देशद्रोही आपल्या देशात आहेत असं तरुण सागर यांनी केलं आहे. प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर यांनी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात पिपराली येथे वैदिक आश्रमात पत्रकारांशी बातचीत करताना हे वक्तव्य केलं आहे.
 
तरुण सागर बोलले आहेत की, "देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात, मग अशी लोक देशद्रोही नाहीत तर मग कोण आहेत". जम्मू काश्मीरमध्ये वारंवार जवानांवर होणा-या दगडफेकीवर भाष्य करताना तरुण सागर यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
(जैन साधू तरुण सागर यांची ददलानी यांनी मागितली माफी)
 
यावेळी तरुण सागर यांनी दहशतवादी हल्ल्यांवरही भाष्य केलं आहे. "दहशतवादी वाघाप्रमाणे समोरुन वार करत नाही, ते तर लांडग्याप्रमाणे मागून हल्ला करतात", असं तरुण सागर बोलले आहेत. 
 
यावेळी तरुण सागर यांनी देशातील गरिबीवरही भाष्य केलं. "लोक म्हणतात भारत गरीब देश आहे, पण भारत गरीब देश नाही. मला वाटतं देशात गरीबी नाही तर असामनता आहे", असं स्पष्ट मत तरुण सागर यांनी व्यक्त केलं आहे. 
 
आपल्या बेधडक वक्तव्यं आणि प्रवचनांवरही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तरुण सागर यांनी सांगितलं की, "कडूपणा माझ्या प्रवचनांमध्ये नाही, तर समाज आणि लोकांच्या आपापसताली संबंधांमध्ये आहे. यामुळे माझी प्रवचने बेधडक वाटू शकतात".
 
याआधी एकदा संगीतकार विशाल ददलानी याने तरुण सागर यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट केलं होतं ज्यासाठी त्याला माफी मागावी लागली होती. ददलानी यांनी तरुण सागर महाराजांबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते व त्यामुळे वाद उफाळला होता.
 
ददलानी तरुण सागर महाराजांच्या येथील आश्रमात गेले णि ‘पंच माफी’ या जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे क्षमा मागितली. ददलानी यांच्या क्षमायाचनेनंतर जैन साधू त्यांना म्हणाले होते की, मी तुम्हाला आधीच माफ केले आहे. तुम्ही जैन समाजाची क्षमा मागावी तसेच ट्विटरवरील ट्विट डीलीट करून हा विषय संपल्याचे जाहीर करावे. तरुण सागर महाराजांनी गेल्या महिन्यात हरियाणा विधानसभेत भाषण केले होते. त्यानंतर ददलानी यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याने वाद उफाळला होता.