शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात जिंकल्या पण...! भाजपाला शतकासाठी हव्या होत्या पाच, पण आणखी तीन घटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 08:49 IST

महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरयाणात शानदार विजय मिळवूनही राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ९५ वरून ९२ वर आले आहे. त्यामुळे १५ राज्यांतील ५७ जागांसाठीच्या निवडणुकीनंतर भाजप राज्यसभेत शंभराचा आकडा गाठू शकलेला नाही; तर, सभागृहात काँग्रेसची सदस्यसंख्या ३० आहे. 

गत सहा दशकांत राज्यसभेत कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. भाजपला हेही शक्य झाले नसते. मात्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मोठ्या प्रयत्नांनी तीन जागा जिंकून हा आकडा गाठता आला आहे. 

अर्थात, तीन जागा कमी झाल्या असल्या तरी पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. राजस्थानातील एक जागेच्या नुकसानीमुळे पक्षनेतृत्व नाराज आहे. नामनिर्देशित सात संसद सदस्यांनी पक्षात प्रवेश केला तरी भाजप १०० चा आकडा गाठू शकत नाही. २४५ सदस्यीय सभागृहात सात जागा रिक्त आहेत. 

आपने सातही जागा जिंकल्या-आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मोठे यश मिळविले.  राज्यसभेच्या सर्व सात जागा जिंकल्या आणि दहाचा आकडा गाठला आहे. - तृणमूलच्या १३ जागांनंतर ‘आप’ हा १० जागा जिंकणारा तिसरा राष्ट्रीय पक्ष आहे. चौथा पक्ष द्रमुककडे १० जागा आहेत. 

अकाली शून्यावर, बसप अवघी एक राज्यसभेत अकाली दलाचा एकही सदस्य राहिलेला नाही. तर, बसपाचा एक सदस्य आहे. सपाची संख्या कमी होऊन तीन झाली आहे. शिवसेना ३, राष्ट्रवादीचे ४ सदस्य आहेत. आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस ९ सदस्यांसह पाचवा मोठा पक्ष आहे. 

माकन यांचा पराभव कुणामुळे?हरयाणाच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अजय माकन ०.६ मतांनी पराभूत झाले. बीजेपी-जेजेपी समर्थित अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांचा पराभव केला. अजय माकन यांच्या पराभवामुळे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित होत आहेत.

भाजपचा गड अभेद्य राहिला नाहीनिकाल पाहिल्यानंतर भाजपचा निवडणूक गड अभेद्य राहिला नसल्याचे समोर येते. भाजप समर्थित उमेदवार विजय मिळवू शकले नाहीत. विरोधकांतील एकजूट समोर येत असतानाच पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप