शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:20 IST

युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याची दीर्घकाळाची मागणी मान्य करून युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक सहायता सध्याच्या २ लाखांवरून ८ लाख करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धातील शहिदांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण निधीच्या अंतर्गत ही मदत करण्यात येईल. युद्धात शहीद झालेल्या आणि ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या सैनिकांना २ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. ही मदत पेन्शन, सैन्य सामूहिक विमा, सेना कल्याण निधी याशिवाय दिली जाते.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे.

सैन्य कल्याण निधीचा उपयोग युद्धातील शहिदांचे मुले आणि कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाºया योजनांसाठी केला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैनिक कल्याण निधीतील मदतीशिवाय सैन्य समूह विम्याचे ४० ते ७५ लाख रुपयांचा समावेश आहे.

रालोआ सरकारमध्ये गत कार्यकाळात गृहमंत्री असताना राजनाथ सिंह यांनी निमलष्करी दलाच्या कर्मचाºयांच्या सहायतेसाठी ‘भारत के वीर’निधीची स्थापना केली होती.राजनाथ सिंह यांचे ‘अच्छे दिन’!नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याशी सातत्याने सल्ला मसलत करीत असल्याचे समोर आले आहे. राजनाथ सिंह हे मोदी सरकारमध्ये क्रमांक-२ चे नेते असले तरी अमित शहा यांच्यासाठी त्यांच्याकडील गृहमंत्रीपद काढून घेण्यात आल्यामुळे त्यांची राजकीय शक्ती कमी झाल्याचे मानले जात होते. आपल्या पहिल्या कारकीर्दीतही मोदी हे राजनाथ सिंह यांच्यापेक्षा माजी वित्तमंत्री स्व. अरुण जेटली, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यावर अधिक अवलंबून होते.तथापि, हे चित्र पालटल्याचे २ आॅक्टोबर रोजी पहिल्यांदा समोर आले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मोदी हे राजनाथ यांना आपल्या कक्षात घेऊन गेले. दोघांनी ३0 मिनिटे चर्चा केली. मोदी यांची राजनाथ यांच्या सोबतची ही तिसरी समोरा-समोर बैठक होती, अशीही माहिती त्यानंतर बाहेर आली. २ आॅक्टोबरच्या चर्चेनंतर दुसºयाच दिवशी राजनाथ यांचे विश्वासू आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची राज्यसभेवर नेमणूक करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून त्रिवेदी यांची नेमणूक रखडली होती. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ नेत्यांनाही यापूर्वीच राज्यसभेत पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान