शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:20 IST

युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याची दीर्घकाळाची मागणी मान्य करून युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक सहायता सध्याच्या २ लाखांवरून ८ लाख करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धातील शहिदांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण निधीच्या अंतर्गत ही मदत करण्यात येईल. युद्धात शहीद झालेल्या आणि ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या सैनिकांना २ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. ही मदत पेन्शन, सैन्य सामूहिक विमा, सेना कल्याण निधी याशिवाय दिली जाते.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे.

सैन्य कल्याण निधीचा उपयोग युद्धातील शहिदांचे मुले आणि कुटुंबियांसाठी राबविण्यात येणाºया योजनांसाठी केला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैनिक कल्याण निधीतील मदतीशिवाय सैन्य समूह विम्याचे ४० ते ७५ लाख रुपयांचा समावेश आहे.

रालोआ सरकारमध्ये गत कार्यकाळात गृहमंत्री असताना राजनाथ सिंह यांनी निमलष्करी दलाच्या कर्मचाºयांच्या सहायतेसाठी ‘भारत के वीर’निधीची स्थापना केली होती.राजनाथ सिंह यांचे ‘अच्छे दिन’!नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याशी सातत्याने सल्ला मसलत करीत असल्याचे समोर आले आहे. राजनाथ सिंह हे मोदी सरकारमध्ये क्रमांक-२ चे नेते असले तरी अमित शहा यांच्यासाठी त्यांच्याकडील गृहमंत्रीपद काढून घेण्यात आल्यामुळे त्यांची राजकीय शक्ती कमी झाल्याचे मानले जात होते. आपल्या पहिल्या कारकीर्दीतही मोदी हे राजनाथ सिंह यांच्यापेक्षा माजी वित्तमंत्री स्व. अरुण जेटली, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यावर अधिक अवलंबून होते.तथापि, हे चित्र पालटल्याचे २ आॅक्टोबर रोजी पहिल्यांदा समोर आले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मोदी हे राजनाथ यांना आपल्या कक्षात घेऊन गेले. दोघांनी ३0 मिनिटे चर्चा केली. मोदी यांची राजनाथ यांच्या सोबतची ही तिसरी समोरा-समोर बैठक होती, अशीही माहिती त्यानंतर बाहेर आली. २ आॅक्टोबरच्या चर्चेनंतर दुसºयाच दिवशी राजनाथ यांचे विश्वासू आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची राज्यसभेवर नेमणूक करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून त्रिवेदी यांची नेमणूक रखडली होती. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ नेत्यांनाही यापूर्वीच राज्यसभेत पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान