शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirusमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दरमहा पाच हजार रुपये, Kerala सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 08:30 IST

Coronavirus: केरळमध्ये कोविड-१९च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये कोविड-१९च्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या गरीब कुटुंबातील व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्याच्या आर्थिक मदतीशिवाय अतिरिक्त पाच हजार रुपयांची मदत दिली जाईल. मात्र केरळ सरकारच्या या योजनेत केवळ गरीब कुटुंबांचाच समावेश असेल.

केरळ सरकारने दारिद्र रेषेखालील कुटुंबांना पाच हजार रुपयांची अतिरिक्त मासिक मदत तीन वर्षांपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड-१९मुळे मृत्यू झालेल्या बीपीएल कुटुंबांना हे सहाय्य मिळणार आहे. अशा कुटुंबांना सोशल वेल्फेयर, वेल्फेयर फंड किंवा अन्य पेन्शन फंडची उपलब्धता यासाठी अपात्र ठरवणार नाही.

या योजनेबाबत पुढे सांगण्यात आले की, या योजनेचा लाभ त्या कुटुंबांना मिळेल जी राज्यामध्ये राहत आहेत. अशा व्यक्तीचा मृत्यू भलेही राज्यामध्ये किंवा राज्याबाहेर किंवा देशाबाहेर झालेला असो. कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आश्रितांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका पानाचे निवेदन जमा करावे लागेल. सरकारकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये सांगण्यात आले की, संबंधित जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अधिकारी आश्रित कुटुंबामधील कुणी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये किंवा आयकरदाता नाही ना, याचा आढावा घेतली. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना कार्यालयात बोलवले जाणार नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळFamilyपरिवार