शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

नुकसानभरपाईवरून फजिती

By admin | Updated: November 8, 2014 03:09 IST

निवडणूक आयोगाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या नुकसानभरपाईबाबत गृहमंत्रालयाला कडक शब्दांत समज दिली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या नुकसानभरपाईबाबत गृहमंत्रालयाला कडक शब्दांत समज दिली आहे.दंगलपीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा सरकारने केला आहे मग त्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे खंडन का केले नाही, असा सवालही आयोगाने केला आहे. गृह मंत्रालयाने अशा वृत्ताचा ठामपणे इन्कार करायला हवा होता. त्यामुळे शीखविरोधी दंगलीतील पीडितांना नुकसानभरपाई दिली जाणार असेच संकेत दिले गेले आहेत. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती भविष्यात केली जाऊ नये अशी ताकीदही आयोगाने दिली.केंद्र सरकारने १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत मारल्या गेलेल्या प्रत्येकाच्या वारसादाराला पाच लाख रुपये नव्याने भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ३१ आॅक्टोबर रोजी गृहमंत्रालयाला नोटीस जारी करून त्याबाबत उत्तर मागितले. दिल्लीतील विधानसभा पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यामुळे आयोगाने गृहमंत्रालयाला ३ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दिल्ली विधानसभा विसर्जित करण्यात आल्यामुळे आता ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे.प्रभाव पाडणारा निर्णय....२५ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील कृष्णानगर, महरौली व तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपतींनी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याने पोटनिवडणूक रद्द करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलींतील पीडित ३३२५ कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या दंगलीतील पीडितांपैकी २७३३ जणांचा मृत्यू दिल्लीत झाला. ३ नोव्हेंबर रोजी गृहमंत्रालयाने नुकसानभरपाईचा निर्णय घेतला नसल्याचा खुलासा केला. (विशेष प्रतिनिधी)