शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

संसदेतील कोंडी फुटेना

By admin | Updated: December 6, 2014 00:26 IST

या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्याने केलेल्या आवाहनाला झुगारत विरोध पक्षांनी राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी बंद पाडले.

नवी दिल्ली : साध्वी निरंजन ज्योतींची माफी स्वीकारून मनाची विशालता दाखवा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्याने केलेल्या आवाहनाला झुगारत विरोध पक्षांनी राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी बंद पाडले. राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कोणतेही कामकाज होऊ शकले नाही, तर लोकसभेत अनेक विरोधी पक्षांनी साध्वी निरंजन ज्योती यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याच्या मागणीवरून सभात्याग केला. राज्यसभेचे कामकाज चारवेळा तहकूब झाल्यानंतर दुपारी ३ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.लोकसभेत साध्वी निरंजन ज्योती मुद्यावर मोदी यांनी दिलेल्या निवेदनावर असमाधान व्यक्त करीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि अन्य काही पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर, लोकसभेत परत येण्याचे आवाहन सरकारने विरोधी पक्षांना केले. काँग्रेस नेमक्या कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली. लोकसभेचे कामकाज बंद पाडण्याचा हा प्रयत्न ‘बूमरँग’ होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मोदींच्या निवेदनानंतर लगेच काँग्रेस, डावे पक्ष, आययुएमएल, बसपा आणि आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहात केवळ अण्णाद्रमुक, बिजद आणि छोट्या पक्षांचे एक दोन सदस्यच बसून होते.काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांनी सभागृहात परत यावे आणि चर्चेत सहभागी व्हावे. अशा वर्तणुकीमुळे बूमरँग होईल. शेवटी जनता अंतिम न्यायाधीश आहे. काही महत्त्वाची विधेयके पारित करावयाची आहेत. विरोध करणारे विरोधी पक्ष सभागृहात परत येतील आणि संसदेचे महत्त्व समजून घेतील, अशी आशा आहे, असे नायडू म्हणाले; परंतु नायडूंच्या आवाहनाचा कसलाही परिणाम झाला नाही आणि संपूर्ण विरोधक सभागृहाबाहेरच राहिले. त्यानंतर १५ मिनिटांनी कामकाज सुरू झाले. पण काही मोजकेच सदस्य उपस्थित असल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)