शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

फेक न्यूज आदेशामुळे स्मृती इराणी तोंडघशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:47 IST

  खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणा-या पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत.

हरीश गुप्ता  नवी दिल्ली  -  खोट्या बातम्या देणाऱ्या वा तिचा प्रसार करणाºया पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी तोंडघशी पडल्या आहेत. इराणी यांच्या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्याने तो मागे घेण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या.खोट्या बातम्यांची चौकशी करण्याचे अधिकार फक्त प्रेस कौन्सिल आॅफ इंडियालाच आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तीनदा खोट्या बातम्या देणाºया पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता कायमची रद्द केली जाईल, असे पत्रक इराणी यांच्या खात्याने सोमवारी जारी केले. पहिल्यांदा खोटी बातमी दिल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराची अधिस्वीकृती मान्यता सहा महिन्यांसाठी, दुसºयांदा खोटी बातमी दिल्यास एक वर्षासाठी व तिसºया खेपेस अधिस्वीकृती मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा हा आदेश होता.टीका होत असतानाही इराणी आज सकाळपर्यंत या निर्णयाचे जोरात समर्थन करीत होत्या. राजकीय पक्षांनी तसेच पत्रकारांच्या संघटनांनी निर्णयावर कठोर टीका करीत, आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर दुपारी इराणी यांनी यासंदर्भात पत्रकारांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन केले. मात्र त्यानंतर १0 मिनिटांतच पंतप्रधान कार्यालयाने निर्णयच रद्द करण्याचा आदेश दिला. इराणी यांच्या निर्णयावर सर्वात आधी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया आणि नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशन या संस्था बातमी बोगस आहे का, हे ठरवतील, असे इराणी म्हणाल्या होत्या.काँग्रेस व माकपची टीकाया निर्णयाचा वापर प्रामाणिक पत्रकारांना छळण्यासाठी होऊ शकतो, अशी टीका काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. सरकारला अप्रिय वाटणा-या बातम्या देऊ नयेत यासाठीच ही उपाययोजना केलेली नाही ना, असा सवाल काँग्रेसने केला आहे. वृत्तपत्रस्वातंत्र्यासाठी आम्ही आणीबाणीत लढा दिला. बदनामीविरोधी कायद्याविरोधातही मैदानात उतरलो होतो, याचीही त्यांनी आठवण करून दिली.विहिंपही विरोधातया निर्णयाद्वारे केंद्र सरकार देशात अघोषित आणीबाणीच लागू करू पाहत असल्याची टीकाविश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनीही केली होती.

 

 

 

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीJournalistपत्रकारGovernmentसरकार