शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

हैदराबादेत नकली काझीला अटक, आतापर्यंत लावले २०० निकाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:25 IST

आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.

हैदराबाद : आतापर्यंत २०० निकाह लावणा-या एका नकली काझीला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अली अब्दुल्ला रफाई असे त्याचे नाव आहे. पोलिसांना असा संशय आहे की, रफाईसोबत मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान हेही अशाच पद्धतीने निकाह करत होते.हैदराबाद पोलिसांनी एका टोळीचा काही दिवसांपूर्वीच भंडाफोड केला होता. ही टोळी अल्पवयीन मुलींचे अरब देशात विवाह लावून देत होती. पोलिसांनी रफाई आणि फरीद यांच्यासह तीन काझींना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सहायक पोलीस आयुक्त ताजुद्दीन अहमद यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा वक्फ बोर्डाशी संपर्क केला तेव्हा कळाले की, २०१४ पासून रफाईसाठी एकही फॉर्म जारी करण्यात आला नाही. रफाईची काझी म्हणूनअसलेली नियुक्ती काही काळासाठी रोखली होती. त्याला त्यानेउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबितआहे. काझी म्हणून काम करण्यास सद्या त्याला परवानगी नव्हती. त्यामुळेच बोर्डाने त्याला फॉर्म दिला नव्हता.वडिलांच्या जागी ८0 काझीरफाईच्या कार्यालयाची झडती घेणे बाकी आहे. कारण, येथील कागदपत्रे अरबी आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी वक्फ बोर्डाच्या नसीरुल कजाथ आणि अन्य दोन कर्मचा-यांची मदत घेतली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, जेव्हा त्याच्या वडिलांचे २०१३ मध्ये निधन झाले त्यानंतर रफाईने वक्फ बोर्डाच्या कर्मचा-यांचा विश्वास मिळवला.वडिलांच्या मृत्यूनंतर रफाईला काझी म्हणून नियुक्ती मिळाली. पण, तो केवळ एकच दिवस काझी म्हणून राहिला. कारण, दुसºयाच दिवशी त्याची नियुक्ती रद्द करण्यात आली. तेलंगणात असे ८० काझी आहेत ज्यांना वडिलांच्या जागेवर नियुक्ती मिळाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा