शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टाटांचे देशाला मोठे गिफ्ट! नवीन संसद भवन १ रुपयांत बांधून दिले; व्हायरल मेसेजचे सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 14:09 IST

Fact Check About New Parliament And Tata Group: नवे संसद भवन. दोन नवे विक्रम. ही वास्तू केवळ १७ महिन्यांत उभारण्यात आली आहे. टाटांनी त्यासाठी केवळ १ रुपया घेतला, असे मेसेज व्हायरल होत आहेत.

Fact Check About New Parliament And Tata Group: राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक या प्रकल्पाची पाहणी केली.  पंतप्रधान मोदी सुमारे तासभर नव्या संसदेच्या आवारात पाहणी करत होते. या प्रकल्प उभारणीत टाटा समूह सहभागी आहे. टाटांच्या दानशूरपणाच्या गोष्टी कायम चर्चेत असतात. याचबाबत आता सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यात टाटा यांनी नवीन संसद भवन देशाला बांधून देण्यासाठी केवळ १ रुपया घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरेच असे आहे का? या व्हायरल मेसेजमागील तथ्य जाणून घ्या....

 देशाच्या जडणघडणीत टाटा समूहाचे योगदान अतिशय मोठे आहे. सध्या दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची चर्चा आहे. संसदेची नवी दिमाखदार वास्तू उभारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच नव्या वास्तूची पाहणी केली. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील संसदेची नवी वास्तू टाटा समूहाने अवघ्या एका रुपयात आणि १७ महिन्यांच्या रेकॉर्डब्रेक कालावधीत उभारली, असा दावा पोस्टमधून करण्यात आला आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टमध्ये हा दावा केला आहे. ट्विटरवर तर अशा आशयाची असंख्य ट्विट्स पाहायला मिळत आहेत.

१७ महिन्यांत नवीन संसदेचे काम आणि १ रुपया मानधन

नवे संसद भवन. दोन नवे विक्रम. ही वास्तू केवळ १७ महिन्यांत उभारण्यात आली आहे. टाटांनी या वास्तूची उभारणी केली आहे आणि त्यासाठी केवळ १ रुपया घेतला आहे. हे टाटाचं देशासाठी गिफ्ट आहे, असा दावा करणारी अनेक ट्विट्स अनेकांनी केली आहेत. नव्या संसद भवनाची उभारणी टाटा समूहाने केली हा दावा १०० टक्के खरा आहे. ते वास्तव आहे. मात्र १७ महिन्यात वास्तूची उभारणी झाली आणि त्यासाठी टाटा समूहाने केवळ १ रुपया घेतला हे दोन्ही दावे पूर्णपणे खोटे आहेत. 

मग नेमके सत्य काय? 

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी सरकारने निविदा मागवल्या. टाटा समूहाने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत बोली जिंकली. नव्या संसद भवनाच्या उभारणीच्या कामासाठी टाटा समूहाने ८६१ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे १ रुपयात टाटा समूहाने नव्या संसद भवनाची उभारणी केली हा दावा खोटा आहे.

दरम्यान, पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या संसद भवनाच्या कामासाठी लागलेला कालावधी १७ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. त्यामुळे संसद भवनाच्या नव्या वस्तूचे काम केळ १७ महिन्यांत पूर्ण झाले, या दाव्यात तथ्य नाही. १७ महिन्यांत वास्तू उभी राहिली आणि त्यासाठी टाटा समूहाने केवळ १ रुपय घेतला हे दोन्ही दावे खोटे आहेत. त्यात तथ्य नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ParliamentसंसदTataटाटाCentral Governmentकेंद्र सरकार