शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तृणमूल काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:17 IST

कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल ...

कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल कोणाच्या बाजूने आहे, याचे मतदारसंघ, जिल्हावार अहवाल या पक्षाला त्याच्या नेत्यांनी पाठविले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेण्याबाबत खल सुरू आहे.

पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, एक्झिट पोलचे निष्कर्ष बिनबुडाचे असून, भाजपच्या बाजूने झुकणारे आहेत. या निष्कर्षांना आम्ही फार महत्त्व देत नाही. लोकसभा निवडणूक निकालांनंतर नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत अन्य विरोधी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. या निवडणुकांत भाजपचा पराभव होणार हे नक्की आहे.

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सोमवारी भेट घेऊन निकालानंतरच्या संभाव्य स्थितीबाबत चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २४ व भाजपला १६, तर काँग्रेसला दोन जागा मिळतील. डाव्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अखेरच्या घटका - भाजपएक्झिट पोलच्या निष्कर्षांवर मी विश्वास ठेवत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार हे अटळ आहे. तृणमूल सरकारही आता अखेरच्या घटका मोजत आहे. लोकसभा निवडणुकांत आपणच जिंकणार, याबाबत तृणमूलचे ज्येष्ठ नेते ठाम असले, तरी त्या पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांपैकी काही जणांचे मत वेगळे आहे.