शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

तृणमूल काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:17 IST

कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल ...

कोलकाता : भाजपप्रणित एनडीए पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार या एक्झिट पोलच्या निष्कर्षांमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. जनमताचा नेमका कौल कोणाच्या बाजूने आहे, याचे मतदारसंघ, जिल्हावार अहवाल या पक्षाला त्याच्या नेत्यांनी पाठविले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेण्याबाबत खल सुरू आहे.

पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, एक्झिट पोलचे निष्कर्ष बिनबुडाचे असून, भाजपच्या बाजूने झुकणारे आहेत. या निष्कर्षांना आम्ही फार महत्त्व देत नाही. लोकसभा निवडणूक निकालांनंतर नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत अन्य विरोधी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. या निवडणुकांत भाजपचा पराभव होणार हे नक्की आहे.

तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सोमवारी भेट घेऊन निकालानंतरच्या संभाव्य स्थितीबाबत चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २४ व भाजपला १६, तर काँग्रेसला दोन जागा मिळतील. डाव्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अखेरच्या घटका - भाजपएक्झिट पोलच्या निष्कर्षांवर मी विश्वास ठेवत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव होणार हे अटळ आहे. तृणमूल सरकारही आता अखेरच्या घटका मोजत आहे. लोकसभा निवडणुकांत आपणच जिंकणार, याबाबत तृणमूलचे ज्येष्ठ नेते ठाम असले, तरी त्या पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांपैकी काही जणांचे मत वेगळे आहे.