शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

दुष्काळी भागात अतिरिक्त काम

By admin | Updated: September 17, 2015 01:09 IST

देशाच्या विविध भागात अपुरा पाऊस झाल्यामुळे मनरेगांतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात महात्मा गांधी

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात अपुरा पाऊस झाल्यामुळे मनरेगांतर्गत अतिरिक्त ५० दिवसांचे काम पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) कार्डधारकांना शंभर दिवसांचे काम दिले जाते. देशभरात पावसाची तूट १५ टक्क्यांवर गेल्याने खरीप पिकाला जबर फटका बसल्यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला.कर्नाटकने याआधीच ३० पैकी २७ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांनाही दुष्काळाची मोठी झळ पोहोचली आहे.दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या ग्रामीण भागात चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त ५० दिवसांची कौशल्यरहित कामे निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)बेरोजगारीवर मात- ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असताना बेरोजगारीमुळे आलेले नैराश्याचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न करताना ग्रामीण भागातील गरिबांना लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध राज्यांमध्ये अतिरिक्त रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.-अनेक राज्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी पावले उचलली आहेत, अशी माहितीही प्रसाद यांनी दिली.