शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:38 IST

मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे परराष्ट मंत्र्यांकडून संकेत

नवी दिल्ली: लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल, असं महत्त्वपूर्ण विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच हिस्सा आहे आणि लवकरच तो भौगोलिकदृष्ट्या भारतात असेल, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या पुढील धोरणांचे संकेत दिले. मोदी सरकार-२ ला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीरसह कलम ३७० सह आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताच्या भूमिकेवरदेखील भाष्य केलं.  जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल विधानं केली आहेत. कलम ३७० नंतर आता पीओके सरकारच्या अजेंड्यावर असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं. यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील सिंह यांचीच री ओढली. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा कलम ३७०शी काहीही संबंध नाही. पाकिस्तानचा संबंध दहशतवादाशी आहे, असं जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं.  काश्मीर आणि कलम ३७० चा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेणाऱ्या पाकिस्तानलादेखील जयशंकर यांनी टोला लगावला. कलम ३७० हा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा आहे. आंततराष्ट्रीय समुदायाला या विषयाची कल्पना आहे, असं जयशंकर म्हणाले. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र इतर देशांनी पाठिंबा न दिल्यानं पाकिस्तान तोंडावर आपटला होता. जयशंकर यांनी सार्कबद्दल बोलतानाही पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. सार्क दक्षिण आशियातील देशांची संघटना आहे. तिचा संबंध व्यापार, दळणवळणाशी आहे. या गोष्टींमधील सहकार्यासाठी दहशतवादाची आवश्यकता नाही. कोणता देश सार्कला पुढे नेतोय आणि कोणता देश दहशतवादाला प्रोत्साहन देतोय, याचा विचार सार्क देशांनी करावा, असं जयशंकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ