शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सरकारपेक्षा वेगळे मत मांडणे म्हणजे देशद्रोह नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

By देवेश फडके | Updated: March 3, 2021 17:46 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू काश्मीरचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या देशद्रोहाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) परखड मत व्यक्त करत केंद्र सरकारला अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

ठळक मुद्देफारूक अब्दुल्ला यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा सरकारपेक्षा वेगळे मत मांडणे देशद्रोह नाही - सुप्रीम कोर्टपुरावा सादर करू न शकल्याने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते, जम्मू काश्मीरचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या देशद्रोहाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायाने (Supreme Court) परखड मत व्यक्त करत केंद्र सरकारला अप्रत्यक्षरित्या फटकारले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (expressing views different from govt is not sedition says sc rejects plea against farooq abdullah)

सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणे याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर फारूक अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. फारूक अब्दुल्ला यांची खासदारकी रद्द करून भारतीय दंड विधान (IPC) कलम १२४-अ अंतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० सन २०१९ मध्ये रद्द करण्यात आले. यानंतर फारूख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडून मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करू शकला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड ठोठावला. 

काय म्हटले होते याचिकेत?

फारूख अब्दुल्ला यांच्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारूख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच आधारे सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली.

फारूक अब्दुल्ला काय म्हणाले होते?

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यानंतर फारूक अब्दुला यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्राचा हा निर्णय कदापि मान्य नसल्याचे सांगत यासंदर्भात चीनची मदत घेतली जाऊ शकते. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा फारूक अब्दुल्ला यांनी दिला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एPoliticsराजकारण