शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टन कृषी मालाची निर्यात; गहू निर्यातीचा विक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:55 IST

१ लाख ८४ हजार कोटींची उलाढाल : तांदळाची सर्वाधिक निर्यात

नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे आर्थिक वर्षात कृषी मालाची निर्यात वाढली आहे. २०२१-२२ मध्ये देशातून तब्बल ४ कोटी २७ लाख ६३८५६ टन कृषी माल निर्यात झाला असून, १८ लाख ४७ हजार ७६९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तांदळाची निर्यात सर्वाधिक असून, वर्षभरात गहू निर्यातीमध्ये विक्रमी तीनपट वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळावा व कृषी व्यापारातून जास्तीत जास्त विदेशी मुद्रा प्राप्त व्हावी यासाठी शासनाकडून निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. कोरोनामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात अपेक्षित निर्यात झाली नव्हती. २०२१-२२ या वर्षात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे निर्यातीला गती मिळाली होती. वर्षभरात फळे, भाजीपाला, अन्नधान्य, प्रक्रिया केलेल्या वस्तू १०० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या. 

वर्षभरात तांदळाची सर्वाधिक निर्यात झाली आहे. १ कोटी ७२ लाख ६२ हजार २३५ टन बिगरबासमती व २९८४९ टन बासमती  तांदळाची निर्यात झाली. दोन्ही मिळून ७२ हजार ६८ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

वर्षभरात गहू निर्यातीमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २० लाख ८८ हजार ४८७ टन निर्यात झाली होती. २०२१-२२ मध्ये तब्बल ७२ लाख ३९ हजार ३६६ टन निर्यात झाली आहे. गहू निर्यातीची उलाढाल ४०३७ कोटींवरून १५ हजार ८४० कोटी झाली आहे. रशिया व युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे. भारतीय शेतीमालाला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. 

कृषी माल व प्रक्रिया केलेल्या वस्तूंना जगभरातून मागणी वाढली आहे. आर्थिक वर्षात रशिया व युक्रेन युद्धामुळे गव्हाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव - द  ग्रेन, राईस व  ऑईलसीड मर्चंट असो.