शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भगवद्गीतेच्या १0 प्रतींसाठी तब्बल पावणेचार लाख रुपये खर्च; भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणा-या भाजपाच्या राज्यातच गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 06:13 IST

हरयाणामध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. राज्यात २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात झालेल्या या महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना गीता भेट देण्यात आली, त्यासाठी सरकारने तब्बल ३ लाख ८0 हजार रुपये खर्च केले आहेत.

चंदीगड : हरयाणामध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. राज्यात २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात झालेल्या या महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना गीता भेट देण्यात आली, त्यासाठी सरकारने तब्बल ३ लाख ८0 हजार रुपये खर्च केले आहेत. गीतेच्या एका प्रतीची किंमत ३८ हजार रुपये दाखवण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.श्रीमद् भागवद् गीतेची प्रत आॅनलाइन वा गीता प्रेसमधून विकत घ्यायला काय हरकत होती. तिथे ती खूप स्वस्त आहे, मग त्यासाठी जादा रक्कम मोजण्याचे कारण काय, याचे उत्तर मुख्यमंत्री खट्टर यांनी द्यावे, अशी मागणी लोकदलाचे नेते आयएनएलडीचे नेते व खासदार दुष्यंत चौटाला यांनी केली आहे.आपण भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. पण धार्मिक कार्यक्रमात गीतेच्या प्रतींवर इतकी प्रचंड रक्कम खर्च करण्यात निश्चितच गैरव्यवहार झाला आहे, असे चौटाला म्हणाले. स्वपक्षाच्या खासदारांना धार्मिक कार्यक्रमासाठी इतकी रक्कम देण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला.भूपेंद्रसिंह हुड्डा सरकारने जो कार्यक्रमात काही लाखांत केला, त्यावर खट्टर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याबद्दल काँग्रेसनेही भाजपाला धारेवर धरले आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास आपण कॅगकडे या प्रकरणाची तक्रार करू, असे खा. चौटाला म्हणाले. (वृत्तसंस्था)...तर साडेचार हजारचआला असता खर्चगोरखपूरच्या गीता प्रेसने प्रसिद्ध केलेल्या गीतेच्या प्रतीची किंमत १५० ते ४५० रुपये आहे. असे असताना गीतेच्या १0 प्रती विकत घेण्यासाठी ३ लाख ८0 हजार रुपये खर्च करण्यात आले. म्हणजे दहा प्रतींसाठी सरकारला जास्तीत जास्त ४.५ हजार खर्च आला असता. त्याऐवजी जवळपास चार लाख खर्च केले. असे करण्याचे कारण काय, असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय लोकदलाने मनोहरलाल खट्टर सरकारवर टीकेची झोडच उठवली आहे.काळेबेरे आढळल्यास चौकशी करूआरोग्यमंत्री अनिल विज यांनी हे आरोप फेटाळताना, गीता महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होता, त्यामुळे तो त्या पद्धतीने साजरा कणºयात आला, असे सांगितले. तसेच या प्रकरणात काही काळेबेरे आढळून आल्यास त्याची चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू, असेही ते म्हणाले.भाजपाच्या कार्यक्रमात भाजपा नेत्यांना ३० लाखांचे मानधनया कार्यक्रमासाठी भाजपच्या दोन खासदारांनाही मानधन देण्यात आल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले आहे.भाजपाच्या खासदार हेमामालिनी २० लाख तर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना १० लाख रुपये मानधन दिल्याबद्दलही सरकारवर टीका होत आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा