शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

... तर खालशांच्या २०० साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की, कर्फ्यु होता हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना शाहीस्नानासाठी कोसो दूर पायपीट करावी लागली. इतर ठिकाणीही कुंभमेळा भरतो. त्याठिकाणचे पोलिसांकडून भाविकांना त्रास होईल, असे नियोजन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. रामकुंड व साधुग्रामपासून दहा किलोमीटरच्या जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने भाविकांना शाही मिरवणुकीचे दर्शनही झाले नाही. त्यामुळे स्थानिक व परराज्यातून येणार्‍या भाविकांकडून नाराजी व्यक्तकेली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी पुढील पर्वणी काळात भाविकांची गैरसोय होऊन नये, भाविकांची कमीत कमी पायपीट होऊन योग्य नियोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षेला विरोध नाही, सुरक्षा पाहिजेच, मात्र भाविकांचे हाल होणार नाहीत यांचा विचार होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची श्रद्धा असल्याने कुंभमेळ्यात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. भाविकांच्या अडचणी वाढल्यास संख्या अजून घटणार आहे. त्यामुळे नियोजनात बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी दीपंेद्रसिंह कुशवाह यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
इन्फो :
पर्वणी काळात बससेवा हवी
परराज्यातून येणार्‍या भाविकांना रस्त्यांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे स्नानाचा घाट व रस्ता त्यांना समजत नाही. पायपीट जास्त करावी लागल्याने शाहीस्नान न करताच भाविकांना परतण्याची वेळ आली. वृद्ध, मुलांना एवढे अंतर चालत जाणे शक्य होत नाही. त्यासाठी शहर बससेवा सुरू ठेवण्यात यावी.