शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

... तर खालशांच्या २०० साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.

नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्‍या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की, कर्फ्यु होता हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना शाहीस्नानासाठी कोसो दूर पायपीट करावी लागली. इतर ठिकाणीही कुंभमेळा भरतो. त्याठिकाणचे पोलिसांकडून भाविकांना त्रास होईल, असे नियोजन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. रामकुंड व साधुग्रामपासून दहा किलोमीटरच्या जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने भाविकांना शाही मिरवणुकीचे दर्शनही झाले नाही. त्यामुळे स्थानिक व परराज्यातून येणार्‍या भाविकांकडून नाराजी व्यक्तकेली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी पुढील पर्वणी काळात भाविकांची गैरसोय होऊन नये, भाविकांची कमीत कमी पायपीट होऊन योग्य नियोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षेला विरोध नाही, सुरक्षा पाहिजेच, मात्र भाविकांचे हाल होणार नाहीत यांचा विचार होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची श्रद्धा असल्याने कुंभमेळ्यात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. भाविकांच्या अडचणी वाढल्यास संख्या अजून घटणार आहे. त्यामुळे नियोजनात बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी दीपंेद्रसिंह कुशवाह यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
इन्फो :
पर्वणी काळात बससेवा हवी
परराज्यातून येणार्‍या भाविकांना रस्त्यांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे स्नानाचा घाट व रस्ता त्यांना समजत नाही. पायपीट जास्त करावी लागल्याने शाहीस्नान न करताच भाविकांना परतण्याची वेळ आली. वृद्ध, मुलांना एवढे अंतर चालत जाणे शक्य होत नाही. त्यासाठी शहर बससेवा सुरू ठेवण्यात यावी.