शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

EVM-VVPAT पास की नापास? मतांच्या पडताळणीबाबत समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:21 IST

17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. तसेच संशयाला वाव राहू नये म्हणून 50 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली असून, संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या मतांच्या पडताळणीत केवळ 0.0004%  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये फरक असल्याचे निष्पन्न झाले आहे. संपूर्ण देशात केवळ 8 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये अंतर असल्याचे दिसून आले. मेघालयमधील शिलाँग मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये 34 मतांचे अंतर दिसून आले. देशभरात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील हा सर्वात मोठा फरक ठरला आहे.  आंध्र प्रदेशमधील राजमपेट मतदान  केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात मतांचा फरक दिसून आला. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एका मताचा फरक दिसून आला.  राजस्थानमधील चित्तौडगड आणि पाली लोकसभा मतदारसंघातील एकेका मतदान केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये एका मताचा फरक दिसून आला. मणिपूरमध्ये दोन ठिकाणी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. यातील एका ठिकाणी एक तर दुसऱ्या ठिकाणी दोन मतांचा फरक होता.  दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक का दिसून आला याचा तपास करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विविध राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकारी निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांची माहिती गोळा करत आहेत. '' आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत निवडणूक निकालांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झालेल्या नाहीत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची जुळणी न झाल्याची आठ प्रकरणे समोर आली आहेत. लवकरच आम्ही त्याचा तपास करू.'' असे निवडणूक आयोगामधील एका अधिकाऱ्याने सांगितले.  निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकलनानुसा एकूण 20 हजार 687 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ 0.0004 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. दरम्यान, काही मानवी चुकांमुळे हा प्रकार घडला, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी इव्हीएममधून मॉक पोलचा डेटा डिलीट न केल्याने मतामध्ये फरक पडला असावा, असा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.   

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण