शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:02 IST

देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचेही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या ‘अ‍ॅक्सिडेंट इंडिया २०१६’ या अहवालातून समोर आले आहे.या अहवालानुसार, मुंबईत रोज ४ हजार छोटे-मोठे रस्ते अपघात होतात. देशात १,५६८.७२ किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर २३२.५८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यात १ हजार २१० अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक मुंबईत असून त्याखालोखाल नाशिक विभागात अपघातप्रवण स्थळांची संख्या अधिक आहे. मुळात रस्ते वाहतुकीत होणाऱ्या सर्व अपघातांची नोंदणी नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोकडून केली जात नाही, तसेच मृत्यूंच्या नेमक्या कारणाचा मृत्यूशी संबंधित आकडेवारीमध्ये अभाव असल्याने ट्रॉमाशी संबंधित मृत्यूंची नेमकी संख्या ओळखणे अवघड असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.जगात होणाºया एकूण ट्रॉमा मृत्यूंपैकी पाव टक्का मृत्यू भारतात होतात. तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत अंदाजे दोन लाख लोक जखमी झाले आहेत. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ट्रॉमॅटिक ब्रेन-इंज्युरीचे (टीबीआय) मुख्य कारण रस्ते वाहतुकीत होणारे अपघात असल्याचे अभ्यासातून दिसून येते. डॉ. नितीन जगसिया यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयातील आपत्कालीन विभागात प्रत्येक महिन्याला सरासरी ७ हजार २०० रुग्ण दाखल होत असून त्यात सर्वाधिक संख्या ही डोक्याला मार लागलेल्या रुग्णांची असते. ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरींमुळे शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक भारही रुग्णांना सोसावा लागतो. ‘गोल्डन अवर’ दरम्यान किंवा दुखापतीनंतर पहिल्या तासामध्ये तातडीने व प्रभावी वैद्यकीय मदत मिळणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.