शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 04:02 IST

देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचेही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या ‘अ‍ॅक्सिडेंट इंडिया २०१६’ या अहवालातून समोर आले आहे.या अहवालानुसार, मुंबईत रोज ४ हजार छोटे-मोठे रस्ते अपघात होतात. देशात १,५६८.७२ किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर २३२.५८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यात १ हजार २१० अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक मुंबईत असून त्याखालोखाल नाशिक विभागात अपघातप्रवण स्थळांची संख्या अधिक आहे. मुळात रस्ते वाहतुकीत होणाऱ्या सर्व अपघातांची नोंदणी नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोकडून केली जात नाही, तसेच मृत्यूंच्या नेमक्या कारणाचा मृत्यूशी संबंधित आकडेवारीमध्ये अभाव असल्याने ट्रॉमाशी संबंधित मृत्यूंची नेमकी संख्या ओळखणे अवघड असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.जगात होणाºया एकूण ट्रॉमा मृत्यूंपैकी पाव टक्का मृत्यू भारतात होतात. तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत अंदाजे दोन लाख लोक जखमी झाले आहेत. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ट्रॉमॅटिक ब्रेन-इंज्युरीचे (टीबीआय) मुख्य कारण रस्ते वाहतुकीत होणारे अपघात असल्याचे अभ्यासातून दिसून येते. डॉ. नितीन जगसिया यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयातील आपत्कालीन विभागात प्रत्येक महिन्याला सरासरी ७ हजार २०० रुग्ण दाखल होत असून त्यात सर्वाधिक संख्या ही डोक्याला मार लागलेल्या रुग्णांची असते. ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरींमुळे शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक भारही रुग्णांना सोसावा लागतो. ‘गोल्डन अवर’ दरम्यान किंवा दुखापतीनंतर पहिल्या तासामध्ये तातडीने व प्रभावी वैद्यकीय मदत मिळणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.