शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांसाठी दररोज हवाई सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 03:59 IST

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याच शहरातून देशाच्या विविध शहरांना हवाईमार्गे जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ योजनेच्या दुस-या टप्प्यात महाराष्ट्रातील चार शहरांतून देशातील सात शहरांत दररोज हवाई सफर करता येईल.

या योजनेसाठी सहा एअरलाईन्सनी सेवा देण्याचे आश्वासन नागरी उड्डयन मंत्रालयाला दिले आहे. नाशिकच्या ओझरहून दिल्लीसाठी आठवड्यात केवळ तीनच दिवस ‘उडान’चा लाभ मिळेल. या मार्गावर जेट एअरवेजने उडान सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील चार शहरांत सुरू होणाºया उडान सेवेत सर्वाधिक भाडे याच मार्गावर असेल. ओझर-नाशिक व दिल्ली दरम्यानच्या विमानात १६८ सीट असतील.

यातील ४० सीट उडानसाठी आरक्षित असतील व त्यांचे भाडे ३,४६० रुपये असेल. एका अधिका-याने सांगितले की, उडान सेवेच्या अंतर्गत प्रत्येक मार्गावर सीट आरक्षित केलेले आहेत. त्याशिवायच्या सीटसाठी एअरलाईन्स प्रचलित बाजारभावानुसार तिकीट विकणार आहे.या टप्प्यात सर्व शहरांत सहा महिन्यांमध्ये उडान सेवा सुरू करण्यात येणार आहे. सरकार यासाठी सुमारे ६२० कोटी रुपये खर्च करणार आहे. यातून उडान-२च्या सर्व विमानतळांवरील मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील.उडानच्या दुसºया टप्प्यात महाराष्टÑातील जळगाव, कोल्हापूर, ओझर-नाशिक व सोलापूरमधून उड्डाणे सुरू होतील. यात जळगावमधून केवळ अहमदाबादच्या दररोजच्या हवाई सेवेसाठी केवळ ट्रूजेटने तयारी दर्शवली. या मार्गावर ७२ सीट असतील व यातील ३६ उडान सेवेसाठी असतील. याचे भाडे २,२३० रुपये असेल. याशिवायच्या सर्व सीटचे भाडे एअरलाईन्स कंपनी बाजारभावानुसार विक्री करू शकणार आहे.