शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 08:37 IST

राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची शक्यता आणि नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना लक्षात घेता, सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच सांबामध्ये जमावबंदीही (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.

राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. यासोबतच सांबाच्या जिल्हा आयुक्त अनुराधा गुप्ता यांनी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर एक किलोमीटरच्या परिघात जमावबंदी लागू केली आहे.

जम्मूच्या भागातही दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दाट धुके आणि बर्फवृष्टीचा फायदा घेऊन दहशतवादी मोठ्या प्रमाणावर  घुसखोरी करतात.

सीआरपीएफच्या आणखी १८ कंपन्या होणार तैनातजम्मू-काश्मीरमध्ये विशिष्ट समुदायाच्या लोकांची दहशतवादी वेचून हत्या करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८ अतिरिक्त कंपन्या काश्मीरमधील राजौरी, पूँछ येथे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या १८ कंपन्यांमध्ये १८०० जवान असतील.

हिंदुंच्या हत्या सुरूच■ राजौरीमध्येदहशतवाद्यांनी चार हिंदुची हत्या केली. दुसऱ्या दिवशी धनगरी गावात आयईडी स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जण ठार झाले.■ सध्या या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्यात आला.■ राजौरी येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ८ जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जम्मू आणि काश्मिर सरकारने दिली आहे. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल