शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकलनंतरही खो-यात अतिरेक्यांचे थैमान, हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 02:27 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटच्या वतीने चालवल्या जात असलेल्या साऊथ अशिया टेररिझम पोर्टलच्या (एसएटीपी) माहितीचे इंडियास्पेन्डने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे की, दहशतवादाशी संबंधित मृत्यू २०१५-२०१६मध्ये २४६ होते तर २०१६-२०१७मध्ये (२४ सप्टेंबर २०१७पर्यंत) ३२३ होते.याचाच अर्थ असा की, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणिकाश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ले याचे प्रमाण कमी झाले नसून, त्यात वाढच झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गरज भासली तर आणखी सर्जिकल स्ट्राइक्स होऊ शकतात, असे संकेत मध्यंतरी दिले. पण त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.आम्हाला काय म्हणायचे आहे याचा संदेश सर्जिकल स्ट्राइकद्वारे त्यांना दिला गेला आणि तो त्यांना समजलाही, असे रावत २५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणाले होते. रावत म्हणाले होते की, ‘‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या सुरूच असल्यामुळे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे.’’प्रसारमाध्यमांतील वृत्तान्तांवरून एसएटीपीने ही मृत्यूबद्दलची माहिती गोळा केली असून, ती २४ सप्टेंबरपर्यंतची आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५-२०१६मध्ये १५७ दहशतवादी ठार मारले होते तर १९४ जणांना २०१६-२०१७मध्ये ठार मारण्यात आले.- दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात सुरक्षा दलांचे जवान मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण २०१५-२०१६मध्ये ७० होते तर २०१६-२०१७मध्ये ७७ जवान ठार झाले. दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात नागरिक मरण पावण्याचे प्रमाण २०१६-२०१७मध्ये ५२ होते तर २०१५-२०१६मध्ये १० नागरिक ठार झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर