शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतरही मृतांचा नेमका आकडा उपलब्ध नाही

By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST

निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे.

भोपाळ : १९८४ सालच्या २ व ३ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाईड या कंपनीत मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे. याचसोबत या कंपनीच्या परिसरात तेव्हापासून पडून असलेल्या व प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ३५० टन कचऱ्याचीही विल्हेवाट अद्याप लावलेली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.या दुर्घटनेत २५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा स्वयंसेवी संस्था एकीकडे करत असताना राज्य सरकार मात्र हा आकडा केवळ ५,२९५ एवढा असल्याचे सांगताना दिसत आहे. भोपाळ वायूगळती दुर्घंटना मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी, आतापर्यंत ५,२९५ एवढ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे सांगितले. तर भोपाळ ग्रूप फॉर इन्फर्मेशन अ‍ॅन्ड अ‍ॅक्शनच्या कार्यकर्त्या रचना ढिंगरा यांनी हा आकडा २५ हजाराहून अधिक असल्याचे म्हटले आहे. २०१२ सालच्या घोषणेनुसार राज्य सरकारने दुर्घटनेबाबत स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या समितीने १५३४२ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यासाठी १०-१० लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी केली होती. दरम्यान, भोपाळ विषारी वायू गळती कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संसदेने श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे दुर्घटनेस कारणीभूत कंपनीच्या प्रतिमेचे भोपाळमध्ये दहन करण्यात आले. (वृत्तसंस्था)