शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

३० वर्षांनंतरही मृतांचा नेमका आकडा उपलब्ध नाही

By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST

निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे.

भोपाळ : १९८४ सालच्या २ व ३ डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाईड या कंपनीत मिथाईल आयसोसायनेट या विषारी वायूच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांची नेमकी संख्या या दुर्घटनेला ३० वर्षे लोटूनही राज्य प्रशासनाला अद्याप निश्चित करता आली नसल्याचा आरोप येथील सेवाभावी संस्थांनी केला आहे. याचसोबत या कंपनीच्या परिसरात तेव्हापासून पडून असलेल्या व प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ३५० टन कचऱ्याचीही विल्हेवाट अद्याप लावलेली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.या दुर्घटनेत २५ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा स्वयंसेवी संस्था एकीकडे करत असताना राज्य सरकार मात्र हा आकडा केवळ ५,२९५ एवढा असल्याचे सांगताना दिसत आहे. भोपाळ वायूगळती दुर्घंटना मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव के.के. दुबे यांनी, आतापर्यंत ५,२९५ एवढ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेल्याचे सांगितले. तर भोपाळ ग्रूप फॉर इन्फर्मेशन अ‍ॅन्ड अ‍ॅक्शनच्या कार्यकर्त्या रचना ढिंगरा यांनी हा आकडा २५ हजाराहून अधिक असल्याचे म्हटले आहे. २०१२ सालच्या घोषणेनुसार राज्य सरकारने दुर्घटनेबाबत स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या समितीने १५३४२ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यासाठी १०-१० लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी केली होती. दरम्यान, भोपाळ विषारी वायू गळती कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संसदेने श्रद्धांजली अर्पण केली. दुसरीकडे दुर्घटनेस कारणीभूत कंपनीच्या प्रतिमेचे भोपाळमध्ये दहन करण्यात आले. (वृत्तसंस्था)