अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
वाढीव उत्पादन क्षमतेमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण जवळपास १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१३ मध्ये ते अवघे १.५३ टक्के होते. त्यामुळे देशाचे १.१० लाख कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. तसेच ऊस व अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ पर्यंत देशाची इथेनॉल डिस्टिलेशन क्षमता अवघी ४२१ कोटी लिटर इतकी होती. सरकारने धोरणांत बदल केले तसेच इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारणीसाठी व्याज सबसिडी दिली. त्यामुळे आता इथेनॉल उत्पादन क्षमता १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. चालू ईएसवायमध्ये मेपर्यंत ५४८ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात आले आहे. मागील ११ वर्षांत साखर कारखाने व डिस्टिलरी प्रकल्पांना इथेनॉल निर्मितीतून २ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. आहे.