शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:34 IST

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.जन आक्रोश सभेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने कारस्थान ...

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.जन आक्रोश सभेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने कारस्थान रचून संसदेत येऊच दिला नाही. या प्रकारामुळे संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आली. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. जगभरात तेलाचे भाव घसरतआहेत पण मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविण्यात गुंतले आहे. नीरव मोदी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाबाहेर पळाला. अशा घोटाळ््यांमुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली आहे. या विपरित स्थितीतून बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्षाला जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही डॉ. सिंग यांनी केले. या जन आक्रोश सभेत गुलाम नबी आझाद, ए. के.अ‍ॅन्टोनी, चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, कॅप्टन अमरेंद्रसिंग, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, अशोक गहलोत आदी मान्यवर काँग्रेस नेते व्यासपीठावर उपस्थित होते.सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लासरकारी यंत्रणांचा वापर करून मोदी सरकार विरोधकांचा आवाज बंद करू पाहात आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. जन आक्रोश सभेत त्या बोलत होत्या. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असे सांगून सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकरी, मजूर, आदिवासी, युवक, सामान्य माणूस भयभीत झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहेत. मोदींची सारी आश्वासने फोल ठरल्याचे जनतेला आता कळून चुकले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहिणीही त्रस्त आहेत. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार आणखी वाढला. प्रसारमाध्यमांवरील दबाव मोदींच्या काळात वाढला आहे. राज्यघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून तिला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात लढा दिला पाहिजे असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.महागाई व भ्रष्टाचार वाढतोय... मोदींच्या राज्यात महागाई व भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असेही त्या म्हणाल्या.युवा, वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक - राहुलकाँग्रेस पक्षाला युवा कार्यकर्त्यांइतकीच वरिष्ठ नेत्यांचीही गरज आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जो ज्येष्ठ नेत्यांंचा अवमान करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राहुल गांधींनी दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये अपमान करण्यात येतो. मात्र काँग्रेस आपल्या ज्येष्ठांना सन्मानानेच वागवेल, असे ते म्हणालेवेगवेगळ्या मतांचा आदरकाँग्रेस पक्षात वेगवेगळ््या विचारांचे लोक आहेत. सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केलेल्या मताचा मी आदर करतो. नानाविध दृष्टिकोन, मते व्यक्त करण्यास काँग्रेस पक्षात नेहमीच वाव असेल असेही ते पुढे म्हणाले.साठ महिन्यांंचे काय झाले?मोदी यांनी साठ महिन्यांत देशाचा कायापालट करू, असा विश्वास देशाला दिला होता. त्याचे काय झाले, असा सवालही राहुल यांनी केला.हा तर ‘परिवार आक्रोश’- अमित शहाकाँग्रेसची ही ‘जन आक्रोश रॅली’ प्रत्यक्षात सुरु होण्याआधीच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्तेतून दूर फेकल्या गेलेल्या एका ‘परिवाराची आक्रोश रॅली’ अशी खिल्ली उडविली. शहा यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, एकापोठोपाठ एका राज्यांतून जनादेशाने बाहेर फेकले गेलेले एक घराणेशाही कुटुंब आणि त्यांच्या हुजऱ्यांनी ‘जन आक्रोशा’चा कांगावा करावा यावरून ते किती कालबाह्य झाले आहेत हेच स्पष्ट होते.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी