शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

मोदींच्या काळात लोकशाही धोक्यात!, मनमोहन सिंग यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:34 IST

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.जन आक्रोश सभेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने कारस्थान ...

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशातील घटनात्मक संस्थांचा मोदी सरकारकडून ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे त्यावरून स्पष्ट होते की, या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा घणाघाती हल्ला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केला.जन आक्रोश सभेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने कारस्थान रचून संसदेत येऊच दिला नाही. या प्रकारामुळे संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आली. मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. जगभरात तेलाचे भाव घसरतआहेत पण मोदी सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविण्यात गुंतले आहे. नीरव मोदी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाबाहेर पळाला. अशा घोटाळ््यांमुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली आहे. या विपरित स्थितीतून बाहेर काढण्यासाठी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्षाला जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही डॉ. सिंग यांनी केले. या जन आक्रोश सभेत गुलाम नबी आझाद, ए. के.अ‍ॅन्टोनी, चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, कॅप्टन अमरेंद्रसिंग, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, अशोक गहलोत आदी मान्यवर काँग्रेस नेते व्यासपीठावर उपस्थित होते.सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लासरकारी यंत्रणांचा वापर करून मोदी सरकार विरोधकांचा आवाज बंद करू पाहात आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. जन आक्रोश सभेत त्या बोलत होत्या. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असे सांगून सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकरी, मजूर, आदिवासी, युवक, सामान्य माणूस भयभीत झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत. बेरोजगार युवक रोजगाराच्या शोधात वणवण भटकत आहेत. मोदींची सारी आश्वासने फोल ठरल्याचे जनतेला आता कळून चुकले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गृहिणीही त्रस्त आहेत. मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार आणखी वाढला. प्रसारमाध्यमांवरील दबाव मोदींच्या काळात वाढला आहे. राज्यघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून तिला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात लढा दिला पाहिजे असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.महागाई व भ्रष्टाचार वाढतोय... मोदींच्या राज्यात महागाई व भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. सत्य, अहिंसा व प्रेमाची जागा मोदींच्या कारकिर्दीत खोटारडेपणा, विद्वेष व हिंसेने घेतली आहे. देशातील घटनात्मक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असेही त्या म्हणाल्या.युवा, वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक - राहुलकाँग्रेस पक्षाला युवा कार्यकर्त्यांइतकीच वरिष्ठ नेत्यांचीही गरज आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जो ज्येष्ठ नेत्यांंचा अवमान करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राहुल गांधींनी दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये अपमान करण्यात येतो. मात्र काँग्रेस आपल्या ज्येष्ठांना सन्मानानेच वागवेल, असे ते म्हणालेवेगवेगळ्या मतांचा आदरकाँग्रेस पक्षात वेगवेगळ््या विचारांचे लोक आहेत. सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केलेल्या मताचा मी आदर करतो. नानाविध दृष्टिकोन, मते व्यक्त करण्यास काँग्रेस पक्षात नेहमीच वाव असेल असेही ते पुढे म्हणाले.साठ महिन्यांंचे काय झाले?मोदी यांनी साठ महिन्यांत देशाचा कायापालट करू, असा विश्वास देशाला दिला होता. त्याचे काय झाले, असा सवालही राहुल यांनी केला.हा तर ‘परिवार आक्रोश’- अमित शहाकाँग्रेसची ही ‘जन आक्रोश रॅली’ प्रत्यक्षात सुरु होण्याआधीच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्तेतून दूर फेकल्या गेलेल्या एका ‘परिवाराची आक्रोश रॅली’ अशी खिल्ली उडविली. शहा यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, एकापोठोपाठ एका राज्यांतून जनादेशाने बाहेर फेकले गेलेले एक घराणेशाही कुटुंब आणि त्यांच्या हुजऱ्यांनी ‘जन आक्रोशा’चा कांगावा करावा यावरून ते किती कालबाह्य झाले आहेत हेच स्पष्ट होते.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी