शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 05:54 IST

भारताचा नागरिक असणे ही सर्वांत श्रेष्ठ ओळख आहे. भारत लोकशाहीची जननी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतात अनेक गोष्टींमध्ये वैविध्य असूनही सर्व भारतीयांना समान संधी, अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भारताची राज्यघटना हा उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज आहे. नागरिकांनी सलोखा, बंधुत्वाची भावना कायम ठेवून देशाची प्रगती साधली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.  

७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, भारतात जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश, कुटुंब, पेशा, अशा गोष्टींमुळे प्रत्येकाला वेगळी ओळख मिळाली आहे; पण या सर्वांपेक्षा भारताचा नागरिक असणे ही सर्वांत श्रेष्ठ ओळख आहे. भारत लोकशाहीची जननी आहे.

 प्राचीन काळापासून भारतामध्ये लोकशाही परंपरा जपणाऱ्या संस्था अस्तित्वात होत्या. ब्रिटिशांच्या राजवटीत या संस्था नष्ट करण्याचे काम करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यावर भारतात नवी पहाट अवतरली. भारताला केवळ विदेशी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले नाही, तर स्वत:चे नशीब उजळ करण्याची पुन्हा संधी मिळाली. 

हवामान बदलाकडे तातडीने लक्ष द्या

वारंवार येणारे पूर, काही ठिकाणी पडणारे दुष्काळ ज्यामुळे होतात त्या हवामान बदल व ग्लोबल वॉर्मिंग या दोन गोष्टींकडे शास्त्रज्ञ व धोरणकर्त्यांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. जी-२० गटातील देश जगातील तीन चतुर्थांश प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. या संघटनेच्या अध्यक्षस्थानी भारत आहे. जागतिक प्रश्न सोडविण्यासाठी भारत मोठी भूमिका बजावणार आहे, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

सरकारने महागाईला ठेवले नियंत्रणात

जागतिक स्तरावरील महागाई हा सर्वांसमोरील चिंतेचा विषय आहे. मात्र, भारतातील केंद्र सरकार, रिझर्व्ह बँकेने या महागाईवर नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे. देशातल्या दुर्बल गटातील लोकांसाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या. त्याच्या परिणामी अनेक लोकांची गरिबीपासून मुक्तता झाली आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अमलात आणले. 

चंद्रयान-३ महत्त्वाचा टप्पा

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, येत्या काही दिवसांत चंद्रयान-३ वरील विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल होतील. चंद्रयान मोहीम ही भारताच्या आगामी अवकाश मोहिमांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. अवकाश संशोधनात भारताला आणखी खूप प्रगती करायची आहे. केंद्र सरकारने अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्यासाठी ५० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्याचा फायदा कुटुंब व देशाला होतो. त्यामुळे या मुद्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.

 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष