शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
3
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
4
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
5
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
6
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
8
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
9
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
10
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
11
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
12
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
13
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
14
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
15
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
16
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
17
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
18
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
19
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
20
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

दिवाळीत फटाक्यांवर संपूर्ण बंदी अशक्य - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: October 29, 2015 01:14 IST

दिवाळीत फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही. शिवाय तसे केल्याने सामान्य नागरिकाच्या धार्मिक सण साजरा करण्याच्या हक्काचीही पायमल्ली होईल

नवी दिल्ली : दिवाळीत फटाके वाजविण्यावर संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही. शिवाय तसे केल्याने सामान्य नागरिकाच्या धार्मिक सण साजरा करण्याच्या हक्काचीही पायमल्ली होईल, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या बंदीचा कोणताही आदेश देण्यास बुधवारी स्पष्ट नकार दिला.अर्जुन गोपाल, आरव भंडारी आणि झोया राज भसिन या तीन छोट्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या मार्फत केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, आम्ही अशी बंदी घालायचे म्हटले तर लोक म्हणतील फटाके वाजविणे हा आमचा हक्क आहे. अशा बंदीने गंभीर, अगदी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. संपूर्ण बंदी नाही तरी निदान फटाके वाजविण्यास वेळेचे काही बंधन घालावे व गावातील एखादी जागा ठरवून लोकांनी तेथे जाऊन फटाके वाजवावे, अशी काही तरी व्यवस्था करावी, असे याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांचे म्हणणे होते. यालाही नकार देताना सरन्यायाधीश म्हणाले, सॉरी, प्रत्येकाने गावातील नेहरू मैदानासाराख्या एखाद्या ठराविक ठिकाणी जाऊनच फटाके वाजवावेत, असे आम्ही सांगू शकत नाही. स्वत:च्या घरासमोर किंवा घराबाहेरही फटाके वाजवू नका, असे लोकांना कसे काय सांगता येईल? असे करणे अव्यवहार्य ठरेल. त्यामुळे ज्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असा कोणताही आदेश आम्ही देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणाऱ्या २००५ मध्ये दिलेल्या आपल्या आदेशाचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळात मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यास पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे. मात्र फटाक्यांचे आवाज आणि धूर यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबात जनजागृती करणे व लोकांना नियमांचे पालन करण्यास उद्युक्त करणे यासाठी पुरेशा गांभीर्याने प्रसिद्धी व प्रचार केला जात नसल्याबद्दल खंडपीठाने सरकारवर नाराजी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)