शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आईला भेटण्यासाठी अभियंत्याचा बाईकवरून सव्वादोन हजार किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:25 IST

अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.

श्रीविल्लीपुत्तुर : आजारी आईला लॉकडाऊनमुळे भेटणे अशक्य झाल्याने दिवसरात्र तळमळणाऱ्या व अहमदाबादमध्ये प्रॉजेक्ट इंजिनिअर म्हणून काम करणाºया एन. चंद्रमोहन (४३ वर्षे) यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.चंद्रमोहन यांच्या आईने काचबिंदूमुळे एक डोळा गमावला असून तिची प्रकृती बिघडली होती. तिचा एक मुलगा चेन्नई व मुलगी तिरुवन्नमलाई या ठिकाणी राहातात. लॉकडाऊनमुळे या दोघांनाही आपली आई राहात असलेल्या सिरकाझी गावाला जाणे शक्य होत नव्हते. आई एकटी पडली असेल या भावनेने आणखी अस्वस्थ झालेल्या चंद्रमोहन यांनी अहमदाबाद जिल्हा प्रशासनाकडून ई-पास मिळवून आपल्या बाईकवरून २२ एप्रिल रोजी तामिळनाडूच्या दिशेने कुच केले. वाटेत जंगलातून जाणारा रस्ता दिवसाढवळ््या पार करायचा, तसेच रात्री पेट्रोल पंप किंवा एखादे बरे ठिकाण बघून तिथे झोप काढायची असे त्यांनी ठरविले होते. आपल्या सॅकमध्ये बिस्किटांचे पुडे व पाण्याच्या बाटल्या भरून ते प्रवासाला निघाले. एका स्वयंसेवी संस्थेने प्रवासादरम्यान चंद्रमोहन यांची सकाळ व संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्याच्या भरवशावर त्यांनी हा प्रवास पार पाडला. दिवसाला पंधरा तास ते बाईक चालवत असत. दर एक तासाने थांबून ते पाच मिनिटे विश्रांती घेत व मग मार्गस्थ होत. अखेर २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठला वात्रपला आपल्या सासरी पोहोचले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांना हटकले पण ई-पास असल्याने त्यांना कोणीही रोखले नाही .