शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

प्रत्येक देशासाठी ऊर्जा सुरक्षा अतिशय महत्त्वाची; केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:16 IST

 अनुभा जैन - बंगळुरू : प्रत्येक देश ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देतो. ऊर्जा सुरक्षा व तंत्रज्ञानाशिवाय विद्युतपुरवठ्याबद्दल कोणताही महत्त्वाचा निर्णय ...

 अनुभा जैन -

बंगळुरू : प्रत्येक देश ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देतो. ऊर्जा सुरक्षा व तंत्रज्ञानाशिवाय विद्युतपुरवठ्याबद्दल कोणताही महत्त्वाचा निर्णय घेता येणे शक्य नाही. चोवीस तास अक्षय ऊर्जेचे लक्ष्य तिच्या साठवणुकीशिवाय गाठता येणार नाही. भारताने २०३० पर्यंत आपल्या बिगर जिवाश्म ऊर्जा क्षमतेचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची योजना आखली आहे, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी म्हटले आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ऊर्जा संक्रमणासंदर्भातील कार्यकारी गटाच्या रविवारपासून सुरू झालेल्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.

बंगळुरू येथील हॉटेल ताज वेस्टएन्ड येथे आयोजिलेली ही बैठक मंगळवारी, ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आर. के. सिंह यांनी सांगितले की, ऊर्जेसंदर्भातील सर्व पैलूंवर जगातील सर्व राष्ट्रांनी चर्चा केली पाहिजे. विकसनशील देशांसमोर ऊर्जेसंदर्भात गंभीर समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ऊर्जा, तंत्रज्ञान, त्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा आदी गोष्टींबाबतच्या आव्हानांना सर्व देशांनी एकजुटीने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.जी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ऊर्जा संक्रमणासंदर्भातील कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीला केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन, स्टोअरेज या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध देशांचे १५०हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. जागतिक बँक, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संघटना या चर्चासत्रात सहभागी झाल्या आहेत. या चर्चासत्राला आलेल्या प्रतिनिधींना इन्फोसिस ग्रीन बिल्डिंग कॅम्पस आणि पावगडा सोलर पार्कही पाहता येणार आहे.